शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 10:28 IST

मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्दे मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील कडता या गावामध्ये ही घटना घडली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचामृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील कडता या गावामध्ये ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे विजेची तार जमिनीवर पडली होती. त्याच दरम्यान तेथे चरण्यासाठी आलेल्या गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील म्हटलं आहे. 

'सागर जिल्ह्यातील कडता गावामध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाला आहे. गायींच्या मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल' असं ट्वीट कमलनाथ यांनी केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (25 ऑगस्ट) गायींचा कळप हा गावाबाहेर असलेल्या परिसरात चरण्यासाठी गेला होता. मुसळधार पावसामुळे विजेचा प्रवाह असलेली एक तार जमिनीवर पडली होती. त्याच दरम्यान विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

 

टॅग्स :cowगायelectricityवीजDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश