शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाषिक राजकारण करणाऱ्यांना दुकाने बंद करावी लागतील; पंतप्रधान मोदींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 08:37 IST

"विकसित देशांची स्थानिक भाषेमुळेच प्रगती"

नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) माध्यमातून देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान व श्रेय दिले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. स्वार्थासाठी भाषांचे राजकारण करणाऱ्या लोकांना आपली दुकाने बंद करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. ‘एनईपी’ला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

मोदी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या क्षमतांऐवजी भाषेच्या आधारावर करणे हा सर्वांत मोठा अन्याय आहे. जगातील अनेक विकसित देशांना त्यांच्या स्थानिक भाषांमुळेच गती मिळाली आहे. युरोपातील बहुतांश देश आपल्या मूळ भाषेचा वापर करतात. भारतात मात्र स्थानिक भाषांना मागासलेपणाची निशाणी म्हणूनच सादर केले जाते. जे लोक इंग्रजी बोलू शकत नाही, त्यांची उपेक्षा केली जाते. त्यांच्या प्रतिभेला मान्यता दिली जात नाही. याचा ग्रामीण भागातील मुलांना सर्वाधिक फटका बसतो. एनपीए आणल्यानंतर देशाने आता या धारणेचा त्याग करण्यास सुरुवात केली आहे. मी संयुक्त राष्ट्रांतही भारतीय भाषेतच बोलतो. सामाजिकशास्त्रांपासून अभियांत्रिकीपर्यंत सगळे विषय भारतीय भाषांत शिकविले जातील. विद्यार्थ्यास जेव्हा आपल्या भाषेबाबत आत्मविश्वास असतो, तेव्हा त्याचे कौशल्य आणि गुणवत्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय आविष्कृत होते. 

या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते ‘पीएम श्री’ योजनेच्या निधीचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. देशातील १२ भाषांतील पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन मोदी यांनी केले. ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ प्रगती मैदानावरील ‘भारत मंडपम’मध्ये होत आहे.

टांझानिया, अबुधाबीत आयआयटी!- मोदी यांनी सांगितले की, जग भारताकडे नव्या शक्यतांची नर्सरी म्हणून पाहत आहे. अनेक देश आपल्या येथे आयआयटी कॅम्पस सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क करीत आहेत. टांझानिया आणि अबुधाबी येथे प्रत्येकी एक आयआयटी कॅम्पस सुरूही करण्यात येत आहे. अनेक जागतिक विद्यापीठे भारतात आपले कॅम्पस सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क करीत आहेत. - भारताला संशोधन व नवतेचे केंद्र बनविणे हे एनईपीचे लक्ष्य आहे. यात ज्ञानाची पारंपरिक व्यवस्था आणि भविष्यान्मुखी तंत्रज्ञान यांना समान महत्त्व दिले आहे.- मातृभाषेतील शिक्षण भारतात विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळविण्यासाठी एका नव्या स्वरुपाची सुरूवात करीत आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने हे खूप महत्त्वपूर्ण पाउल असल्याचे माेदी म्हणाले. 

पंतप्रधानांनी विचारले, मोदीजींना ओळखता का?‘अखिल भारतीय शिक्षण समागम’चे उद्घाटन करण्याआधी मोदी यांनी तेथील एका प्रदर्शनाला भेट दिली. तेथे उपस्थित असलेली मुले मोदींना पाहून खूश झाली. मुलांनी त्यांना ‘नमस्ते’ म्हटले. त्यावेळी पंतप्रधानांनी मुलांना विचारले की, ‘तुम्ही मोदीजींना ओळखता का?’ त्यावर मुले म्हणाली, ‘हो, आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहिले आहे.’ मोदी यांनी मुलांसोबतचा एक व्हिडीओही ट्वीट केला. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘निरागस मुलांसोबचे आनंदाचे काही क्षण! त्यांची ऊर्जा आणि उत्साहामुळे मन आनंदाने भरून जाते.’ 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण