शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rajiv Gandhi Foundation Update: राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन रद्द; केंद्र सरकारची काँग्रेसविरोधात आजवरची सर्वात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 10:24 IST

Rajiv Gandhi Foundation Update: राजीव गांधी फाउंडेशन ही गांधी कुटुंबाशी संलग्न असलेली एनजीओ आहे. राजीव गांधी फाउंडेशनची स्थापना 21 जून 1991 रोजी झाली होती.

केंद्र सरकारने काँग्रेसवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. राजीव गांधी फाउंडेशनचे परदेशातून फंड घेण्याचे लायसन रद्द केले आहे. परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. 

जुलै 2020 मध्ये, गृह मंत्रालयाने मंत्रालयातच चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालाच्या आधारे, हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. परवाना रद्द केल्याची नोटीस राजीव गांधी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राजीव गांधी फाउंडेशन ही गांधी कुटुंबाशी संलग्न असलेली एनजीओ आहे. राजीव गांधी फाउंडेशनची स्थापना 21 जून 1991 रोजी झाली होती. याच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पी चिदंबरम, माँटेक सिंग अहलुवालिया, सुमन दुबे आणि अशोक गांगुली हे अन्य विश्वस्त आहेत. 

फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाइट rgfindia.org वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 1991 ते 2009 पर्यंत, फाउंडेशनने अनेक आरोग्य, साक्षरता, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि बाल विकास, अपंगांना मदत, पंचायती राज संस्थांमध्ये योगदान दिले आहे. तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि लायब्ररी, यासह इतर समस्यांवर काम केले आहे. 

काय चूक केली...जून 2020 मध्ये भाजपने फाउंडेशनवर परदेशी शक्तींकडून निधी स्वीकारल्याचा आरोप केला होता. तत्कालीन कायदा मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने आर्थिक मदत केल्याचा दावा केला होता. सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही पक्ष परदेशातून पैसा घेऊ शकत नाही, असा कायदा आहे. राजीव गांधी फाउंडेशनसाठी 2005-06 साठी देणगीदारांची जी यादी आहे त्यात चीनच्या दूतावासाने देणगी दिल्याचे स्पष्ट म्हटले गेले आहे, असे प्रसाद म्हणाले होते. 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस