शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जेएनयूतील गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 3:36 AM

जेएनयूमध्ये ८६ टक्क्यांची मोडला नियम; किमान हजेरीही नाही

नवी दिल्ली : वर्गांमध्ये किमान आवश्यक उपस्थिती नसलेल्या सुमारे सात हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पत्रे पाठवणार आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांची (सात हजार) वर्गांत किमान आवश्यक तेवढीही हजेरी नाही. जेएनयूमध्ये ८१00 विद्यार्थी शिकतात.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान आवश्यक उपस्थितीचा विद्यापीठाचा हा ताजा नियम असून किमान तीन एमफील/पीएचडी विद्यार्थ्यांना गैरहजेरीबद्दल इशारा देणारी पत्रे १६ एप्रिल रोजी सहायक निबंधकांच्या कार्यालयाने पाठवली आहेत. पत्रात पालकांना उद्देशून म्हटले आहे की, तुमचा पाल्य गेल्या हिवाळी सत्रापासून ते फेब्रुवारीअखेरपर्यंत (२०१८) सगळे दिवस वर्गात परवानगी न घेता गैरहजर आहे. तुमच्या पाल्याच्या भविष्याचा विचार करता तो वर्गांत उपस्थितीचे नियम पाळल, अशी आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत, असेही पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी मात्र विद्यापीठाच्या या कृतीवर टीका केली आहे.संशोधक विद्यार्थ्यांनाही पत्रे हास्यास्पदया पत्राबाबत जेएनयु विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष सिमोन झोया खान यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, हे संशोधन करणारे विद्यार्थी २७ ते २९ वयोगटातील आहेत. त्यांच्या पालकांना पत्रे पाठवून विद्यापीठाला काय म्हणायचे आहे? काही संशोधक विद्यार्थी विवाहीत असून त्यांना मुलेही आहेत. विद्यापीठाचे हे वागणे विद्यार्थ्याचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. बी.ए. किंवा एम. ए. च्या विद्यार्थ्यांबाबत मी हे समजू शकते परंतु संशोधक विद्यार्थ्यांनाही पत्रे हे हास्यास्पद आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक