शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण द्या, मुख्यमंत्री पटनाईक यांचे मोदींना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:39 IST

ओडिशा विधानसभेत महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून महिलांनाआरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच या विधेयकास माझ्या सरकारचा पूर्ण पाठींबा राहिले, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमून केले आहे. महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरूष समानतेबाबत महात्मा गांधी नेहमीच आग्रही असतं. त्यामुळे महिलांना संसदेत एक तृतिअंश आरक्षण दिल्यास हीच खरी महात्मा गांधींना श्रद्धांजली ठरेल, असेही पटनाईक यांनी म्हटले आहे.   

ओडिशा विधानसभेत महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. गेल्या महिन्यात यावर चर्चा झाली आणि अखेर अवाजी मतदानाने ते विधेयक पारित करण्यात आले होते. त्यानंतर, आता संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची मागणी नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महिला आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा उभारणी मिळाली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातूनही लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात भाजपने 2014 च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. 

दरम्यान, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन महिलांचा राजकारणात सहभाग वाढवला. त्यानंतर महाराष्ट्रातही आघाडी सरकारने महिलांना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण देत महिलांचा राजकीय प्रवेश वाढवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात 2010 मध्ये विधेयक संसदेत ठेवण्यात आले होते. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले असले तरी, पंधराव्या लोकसभेची मुदत संपल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. ही बाब या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.    

टॅग्स :reservationआरक्षणWomenमहिलाOdishaओदिशाNarendra Modiनरेंद्र मोदी