शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या ‘मिराज’ने शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:13 IST

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी ...

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी यांचे सरकार असताना ४९ मिराज लढाऊ विमाने खरेदीसाठी करार केला होता. त्या वेळी पाकिस्तान अमेरिकेकडून एफ-१६ विमाने खरेदी करणार होता आणि त्याला उत्तर देण्यासाठीच राजीव गांधी यांनी हा करार केला होता. द सॉल्ट या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. मिराज 2000 लढाऊ विमाने औपचारिकपणे २९ जून, १९८५ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करून त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.

पाकिस्तानात हवाई हल्ल्यासाठी मिराज-२000 विमानांचा वापर करण्यात आला होता. राफेल विमाने बनविणाऱ्या द सॉल्ट कंपनीनेच मिराज विमानांची निर्मिती केली आहे. ही विमाने १९८0च्या दशकात भारतीय हवाई दलात दाखल करून घेण्यात आली होती.हल्ला करण्यासाठी जीबीयू-१२ हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाइडेड बॉम्बचा वापर करण्यात आला. अचूक व नेमका हल्ला हे या बॉम्बचे वैशिष्ट्य आहे.

हल्ला करीत असताना पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाल्यास, त्याचा सामना करण्यासाठी मिराज विमानांमध्ये मॅट्रा मॅजिक क्लोस कॉम्बॅट मिसाइल बसविण्यात आले होते. मॅट्रा ही कंपनीही फ्रान्समधील असून, हवेतून हवेत (एअर टू एअर) हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात येतो.अशा प्रकारच्या हल्ल्यात लक्ष्याचा अचूक माग घेणे गरजेचे असते. जे आपले लक्ष्य आहे, त्यावर बॉम्बहल्ला करण्यासाठी लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील काही देशांतील हवाई दलांकडेच हे अत्याधुनिक पॉड असून, भारतीय हवाई दल त्यापैकी एक आहे.नियंत्रण रेषा ओलांडून १२ मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, तेव्हा भारतीय बनावटीच्या ‘नेत्र’ या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सीस्टिम असलेल्या ड्रोन विमानांद्वारे त्यांच्याशी संपर्क व समन्वय ठेवण्यात आला होता. ‘नेत्र’ हे विमान अत्याधुनिक रडारने सुसज्ज असून, हवाई हल्ले करताना टार्गेट शोधण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक