शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या ‘मिराज’ने शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:13 IST

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी ...

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी यांचे सरकार असताना ४९ मिराज लढाऊ विमाने खरेदीसाठी करार केला होता. त्या वेळी पाकिस्तान अमेरिकेकडून एफ-१६ विमाने खरेदी करणार होता आणि त्याला उत्तर देण्यासाठीच राजीव गांधी यांनी हा करार केला होता. द सॉल्ट या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. मिराज 2000 लढाऊ विमाने औपचारिकपणे २९ जून, १९८५ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करून त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.

पाकिस्तानात हवाई हल्ल्यासाठी मिराज-२000 विमानांचा वापर करण्यात आला होता. राफेल विमाने बनविणाऱ्या द सॉल्ट कंपनीनेच मिराज विमानांची निर्मिती केली आहे. ही विमाने १९८0च्या दशकात भारतीय हवाई दलात दाखल करून घेण्यात आली होती.हल्ला करण्यासाठी जीबीयू-१२ हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाइडेड बॉम्बचा वापर करण्यात आला. अचूक व नेमका हल्ला हे या बॉम्बचे वैशिष्ट्य आहे.

हल्ला करीत असताना पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाल्यास, त्याचा सामना करण्यासाठी मिराज विमानांमध्ये मॅट्रा मॅजिक क्लोस कॉम्बॅट मिसाइल बसविण्यात आले होते. मॅट्रा ही कंपनीही फ्रान्समधील असून, हवेतून हवेत (एअर टू एअर) हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात येतो.अशा प्रकारच्या हल्ल्यात लक्ष्याचा अचूक माग घेणे गरजेचे असते. जे आपले लक्ष्य आहे, त्यावर बॉम्बहल्ला करण्यासाठी लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील काही देशांतील हवाई दलांकडेच हे अत्याधुनिक पॉड असून, भारतीय हवाई दल त्यापैकी एक आहे.नियंत्रण रेषा ओलांडून १२ मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, तेव्हा भारतीय बनावटीच्या ‘नेत्र’ या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सीस्टिम असलेल्या ड्रोन विमानांद्वारे त्यांच्याशी संपर्क व समन्वय ठेवण्यात आला होता. ‘नेत्र’ हे विमान अत्याधुनिक रडारने सुसज्ज असून, हवाई हल्ले करताना टार्गेट शोधण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक