शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"ही तीन कामं सोडा, जनता तुम्हाला विजयी करेल’’, अमित शाहांचा काँग्रेसला टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 23:25 IST

Amit Shah News: काँग्रेसने नेहमी घराणेशाही, लांगुलचालन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. काँग्रेसने या तीन गोष्टी सोडल्या तर जनता त्यांना विजयी करेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

राज्यसभेमध्ये आज संविधानावर झालेल्या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. अमित शाह या चर्चेदरम्यान म्हणाले की, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. इथे घराणेशाही असता कामा नये, भारत एक पंथनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे लांगुलचालनाला थारा असता कामा नये. काँग्रेसने नेहमी घराणेशाही, लांगुलचालन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. काँग्रेसने या तीन गोष्टी सोडल्या तर जनता त्यांना विजयी करेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले की, प्रेमाच्या दुकानाच्या खूप घोषणा ऐकल्या आहे. प्रत्येक गावात दुकान उघडण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्यांची भाषणंही ऐकली आहेत. पण प्रेम ही कााही विकण्याची गोष्ट नाही. ती एक हिंमत आहे, जी अनुभवता येते. 

यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर नागरिकांच्या अधिकारांचं हनन करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आणि कच्छतिवू बेट रातोरात श्रीलंकेला दिल्याच आरोप केला. अमित शाह म्हणाले की, कच्छतिवू बेट आमचा भूभाग आहे. मात्र तो आज आमच्याकडे नाही आहे. काँग्रेसने संसदेत चर्चा न करता तो श्रीलंकेला देवून टाकला होता. 

यावेळी अमित शाह यांनी भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला असा टोला लगावला, शाह म्हणाले की, “गेल्या 75 वर्षांत अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी नव्याने सुरुवात केली. मात्र तेथे लोकशाही यशस्वी ठरू शकली नाही. मात्र आपली लोकशाही खोलवर रुजलेली आहे. आपण रक्ताचा एक थेंबही न सांडता अनेक बदल केले आहेत. या देशातील लोकांनी अनेक हुकूमशहांचा अहंकार लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमाने मोडीत काढला आहे.” 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस