शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:37 IST

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली.

कुवेतमधील मंगाफ शहरात लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४५ भारतीय वंशाचे होते. मृतांमध्ये सर्वाधिक २४ जण केरळचे, पाच तामिळनाडूचे, तीन उत्तर प्रदेश, एक झारखंड आणि दोन जण बिहारचे आहेत. उत्तर प्रदेशातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात गोरखपूरमधील दोन जणांचा समावेश आहे. एक गुलारियाचा जयराम गुप्ता आणि दुसरा गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जैतपूर उत्तरेतील रहिवासी अंगद गुप्ता. 

गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जटेपूर उत्तर येथील रहिवासी अंगद गुप्ता हे ९ वर्षांपूर्वी कुवेतला गेले होते आणि तेथील एका खासगी कंपनीत कॅशियर म्हणून कामाला होते. मंगफ शहरात गुरुवारी लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दूतावासातून आलेल्या फोनवरून हा प्रकार समोर आला आणि तेव्हापासून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.

"मन लावून अभ्यास करा..."

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली. मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, मन लावून अभ्यास करा असा सल्लाही दिला. सध्या या घटनेची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. .

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अंगद यांचे धाकटे भाऊ पंकज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह यापुढे कसा करणार हा प्रश्न पडला आहे. 

मुलीला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी 

कुटुंबीयांनी राज्य व केंद्र सरकारकडे मृतदेह सुखरूप परत आणावा तसेच कुटुंबातील मोठी मुलगी अंशिका हिला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मृत अंगद गुप्ता यांच्या कुटुंबात पत्नी रीता देवी यांच्यासह मोठी मुलगी अंशिका गुप्ता, मुलगा आशुतोष गुप्ता आणि धाकटा मुलगा सुमित गुप्ता यांचा समावेश आहे.

मृतदेह पोहोचले भारतात 

कुवेतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे (IAF) विमान केरळमधील कोची विमानतळावर उतरलं आहे. कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकूण ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेचे C-130J सुपर हर्क्युलस विमान कोची येथे उतरलेल्या भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी रवाना करण्यात आले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश