शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 00:57 IST

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे.

ठळक मुद्देलश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीतलश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहेअब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून पकडलाये टीआरएफचा हात

श्रीनगर : भारतावर भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांची आता आपसातच जुंपली आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीत आहेत. लश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहे. यानंतर हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर असलेल्या अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून, टीआरएफचा हात पकडला. यामुळे टीआएफ आणि लश्कर आता हिजबुलच्या निशाण्यावर आहे.

यासंदर्भात तहरीक-ए-पीपल्स पार्टीने शुक्रवारी हाताने लिहिलेले एक पोस्टर जारी केले आहे. यात, त्यांचा ऑपरेशनल कमांडर अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडली असल्याचे लिहिले आहे. तसेच अब्बासचा, कश्मिरी पोलीस आणि सामान्य नागरिकांना मारण्यास विरोध होता, असेही  यात म्हणण्यात आले आहे.

खूशखबर...कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात आलेली महिला म्हणाली, 'Doing Fine'!

अब्बास 'अंडरग्राउंड' -

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास दावा करतो की, 12 सक्रिय सदस्य आणि अनेक स्थानिक लोक त्याच्या सोबत आहेत.

आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ -

टीआरएफनेही, इस्लामिक जिहादी लोकहो आणि 'रेजिस्टंट टिल व्हिक्ट्री' या पंचलाइनने एक पत्र जारी केले आहे. यात, 'काही दिवसांपूर्वीच आम्ही हिजबुल मुजाहिदीनला इशारा दिला होता, की त्यांनी काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मारणे बंद करावे. मात्र, त्यांनी शोपियांमधून जम्मू-काश्मीरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले. हिजबुल मुजाहिदीनला समजायला हवे, की आपली लढाई भारतीय संरक्षण दलाशी आहे. कश्मिरी लोकांशी नाही. आश्मिरी लोक आपलेच आहेत. आपण त्यांच्या सहकार्याशिवाय संरक्षण दलाशी लढू शकत नाही. आम्ही विचार केला होता, कीआपण एकत्रितपणे लढू मात्र ही आमची मोठी चूक होती,' असे टीआरएफने म्हटले आहे.

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

तसेच जे काश्मीरमधील लोकांना त्रास देतील त्यांच्याशी आम्ही लढू. हिजबुलला हा अखेरचा इशारा आहे. आम्हाला मजबूर करू नका. यानंतर कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. केवळ अॅक्शन घेतली जाईल, असेही टीआरएफने म्हटले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादIslamइस्लामMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस