शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Indian Army: ३८ वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद, स्वातंत्र्यदिनी अखेरची 'सलामी' मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:27 AM

1984 च्या मे महिन्यात सियाचिनला गस्तीसाठी २० जवानांची तुकडी पाठविण्यात आली होती. या घटनेत सर्व जवान शहीद झाले होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचिनवरून युद्ध झाले होते, या युद्धावेळी गस्तीवर असलेल्या २० जवानांना हिमस्खलनात शहीद व्हावे लागले होते. यापैकी एक लांसनायक चंद्रशेखर हर्बोला यांचा मृतदेह ३८ वर्षांनी सापडला आहे. 19 कुमाऊं रेजीमेंटचे ते एक भाग होते. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी दिनावेळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सोमवारी त्यांचे पार्थिव हल्दानीला आणले जाणार आहे. 

उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील द्वाराहाटच्या हाथीगुरचे ते रहिवासी होते. चंद्रशेखर हे 1975 मध्ये सैन्यात भरती झाले होते. तर 1984 मध्ये सियाचिन युद्धावेळी ऑपरेशन मेघदूत मिशनदरम्यान ते शहीद झाले होते. मे महिन्यात सियाचिनला गस्तीसाठी २० जवानांची तुकडी पाठविण्यात आली होती. या घटनेत सर्व जवान शहीद झाले होते. भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. यामध्ये १५ जवानांचे मृतदेह सापडले होते. तर ५ बेपत्ता होते. यापैकीच एक चंद्रशेखर होते. 

चंद्रशेखर यांच्या कुटुंबीयांना रविवारी मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्यासोबत आणखी एक जवानाचा मृतदेह सापडला आहे. चंद्रशेखर यांची पत्नी वीरांगना शांती देवी या सध्या हल्द्वानी येथील पॅडी मिलजवळील सरस्वती विहार कॉलनीत राहतात. एसडीएम मनीष कुमार आणि तहसीलदार संजय कुमार रविवारी त्यांच्या घरी पोहोचले. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले.

38 वर्षांनंतर शहीद जवानाचा मृतदेह सियाचीनमध्ये सापडला आहे. राज्य सरकारकडून ज्या सुविधा, सेवा शहीद जवानांच्या कुटुंबाला दिल्या जातात त्या सर्व देण्यात येतील. - मनीष कुमार सिंह, एसडीएम, हल्द्वानी 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान