शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Lakhimpur Violence: लखीमपूर प्रकरणातील आरोपी, गृहमंत्र्यांचा मुलगा नेपाळला पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:03 IST

Lakhimpur Violence: लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालयान यांनी एक ट्विट करुन, गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्र हा नेपाळला पळून गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले होते. पण, अजूनपर्यंत आशिष मिश्रा किंवा त्यांचे वकीलही गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झालेले नाहीत. तर, आशिष मिश्राला अद्यापही अटक करण्यात न आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आता, आम आदमी पक्षाच्या आमदाराने केलेलं ट्विट चांगलेच चर्चेत आलं आहे. 

लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, त्यास शुक्रवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल होण्यास सांगितले होते. यासंदर्भातील नोटीसही त्याच्या निवासस्थानाबाहेर चिकटवण्यात आली. तसेच, या प्रकरणाच्या तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवालही वेळेवर कार्यालयात पोहोचले. पण, आशिष कार्यालयात आलाच नाही. त्यामुळे, आशिषला अद्याप अटक का नाही, असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. 

आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालयान यांनी एक ट्विट करुन, गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्र हा नेपाळला पळून गेल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे नरेश बालयान यांचं हे ट्विट गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांनी रिट्विट केलं आहे. बालयान यांनी हेही ट्विट करुन सांगितलंय. त्यामुळे, या ट्विटचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच, आशिष मिश्र खरंच नेपाळला पळून गेलाय का, असा प्रश्न अनेकांन पडला आहे. दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये बालयान यांनी, अजय मिश्र यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. अजय मिश्र हे डिझेल आणि चंदनाच्या लाकडाची तस्करी करत होते, जर असा बाप गृहराज्यमंत्री असेल. तर, पोरगा बलात्कारी, हत्यारा निघणारच.. असेही त्यांनी म्हटलं आहे.  

उद्या पोलिसांना शरण येण्याची शक्यता ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रात्री उशिरापर्यंत लखीमपूर खेरीला पोहोचतील आणि त्यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाला सादर करतील. त्यामुळे आशिष मिश्रा उद्या म्हणजेच शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. दरम्यान, आशिष मिश्रा नेपाळला पळून गेल्याच्या काही बातम्या सकाळी माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या, पण याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारHome Ministryगृह मंत्रालयCrime Newsगुन्हेगारीNepalनेपाळ