शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:50 IST

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

लखीमपूर: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने (SIT) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र 5 हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीसह नातेवाईक वीरेंद्र कुमार शुक्लाचे नावही जोडले गेले आहे. वीरेंद्र कुमार शुक्ला यांच्यावर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.

न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वकिलांनी सांगितले की, आरोपपत्रात मंत्री अजय मिश्रा यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या निदर्शनादरम्यान गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष तपास पथकाचे हजारो पानांचे आरोपपत्र आज सकाळी लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले. 

आशिष मिश्रा जामिनावर 6 जानेवारीला सुनावणी3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरच्या तुकानिया येथे एका पत्रकारासह 8 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 13 जण न्यायालयीन कोठडीत आहेत. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

कलम वाढविण्याची माहिती शेतकऱ्यांच्या वकिलांनी दिली

हिंसाचार प्रकरणात शेतकऱ्यांचे वकील अमन म्हणाले की, एफआयआरमध्ये कलम 201 वाढवण्यात आले आहे. तसेच वीरेंद्र कुमार शुक्ला यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्र्याचे नावही जोडण्याची विनंती केली होती, मात्र त्यांचे नाव जोडले गेले नाही. दरम्यान, एसआयटीच्या इन्स्पेक्टर विद्या राम दिवाकर यांनी हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे म्हटले होते. 

आशिष मिश्रावर या कलमांतर्गत गुन्हे दाखलगृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि सहकारी नंदन सिंगवर कलम 177(मोटार वाहन कायदा) आणि 5/25 (आर्म्स अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आरोपपत्र आरोपींना दाखवण्यात आलेले नाही. कोर्टाने आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर कलम 309 अन्वये सर्व आरोपींना कोर्टात बोलावून आरोपपत्राची प्रत दिली जाईल.

हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू 

लखीमपूर येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेत चार शेतकरी, स्थानिक पत्रकार यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार करताना शेतकऱ्यांना त्यांच्या गाडीने तुडवल्याचा आरोप आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले. 4 ऑक्टोबर रोजी टिकुनिया पोलीस ठाण्यात आशिष मिश्रा आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीच्या तपासात हा अपघात नसून सुनियोजित कटातून केलेला खून असल्याचे उघड झाले. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmer strikeशेतकरी संपCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी