शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Lakhimpur Violence Case: जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, 'या' कारणामुळे लांबली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:19 IST

Lakhimpur Violence Case: लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Violence Case)  येथील हिंसाचाराचा मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) उर्फ ​​मोनू याला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्रा 9 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही आशिष मिश्राची तुर्तास सुटका होणार नाही. त्याच्या जामीन आदेशात कलम 302 आणि 120बीचा उल्लेख केलेला नाही.

का लांबली सुटका?आशिष मिश्रा याच्यावर अनेक गंभीर कलमांखाली आरोप आहेत. लखीमपूर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आशिष मिश्रा याला आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 302, 307, 326, 34, 427 आणि 120बी अंतर्गत आरोपी करण्यात आले आहे. यासोबतच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25, 5/27 आणि 39 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, हायकोर्टाने जारी केलेल्या जामीन आदेशात आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 307, 326 आणि 427 व्यतिरिक्त आर्म्स अॅक्टची कलम 34 आणि 30 नमूद करण्यात आली आहे. यात कलम 302 आणि 120बीचा उल्लेख नाही. कलम 302 खून आणि 120B गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे. जामीन आदेशात 302 आणि 120 बीचा उल्लेख नसल्याने आशिष मिश्रा सध्या तुरुंगातून बाहेर येऊ शकत नाही.

कधी होणार सुटका ?आशिष मिश्राच्या वकिलाने सांगितले की, जामीन आदेशात कलम 307आणि 120बी जोडण्यासाठी ते उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. जामीन आदेशात सुधारणा झाल्यानंतरच आशिष मिश्राला जामीन मिळणार आहे.

संबंधित बातमी: 

शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCourtन्यायालय