Lakhimpur Violence Case: मोठी बातमी! शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 02:22 PM2022-02-10T14:22:19+5:302022-02-10T14:22:35+5:30

Lakhimpur Violence Case: केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

Lakhimpur Violence Case: Ashish Mishra son of minister Ajay Mishra got bail | Lakhimpur Violence Case: मोठी बातमी! शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन

Lakhimpur Violence Case: मोठी बातमी! शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन

Next

अलाहाबाद: लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court)लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर येईल.

हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

पाच हजार पानांचे आरोपपत्र

हिंसाचाराच्या प्रकरणात एसआयटीने आरोपपत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. आशिष मिश्रासह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोपपत्रानुसार सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीने चिरडले.

208 जणांनी नोंदवली साक्ष

तपासात, एसआयटीला 17 वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि 24 व्हिडिओ फोटो सापडले, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या. याशिवाय 208 जणांनी साक्ष दिली. या आधारे एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Lakhimpur Violence Case: Ashish Mishra son of minister Ajay Mishra got bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.