शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violence : "लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:34 IST

Lakhimpur Kheri Violence : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी मुलगा आशिष नव्हताच असा दावा अजय मिश्रा यांनी यापूर्वी केला आहे.

नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. याच दरम्यान आता अजय मिश्रा टेनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"आपला मुलगा आशिष मिश्रा लखीमपूर खिरी येथे झालेल्या भीषण हिंसाचाराच्या ठिकाणी असल्याचं सिद्ध करणारे कोणतेही पुरावे समोर आले तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईन" असं आता अजय मिश्रा टेनी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी मुलगा आशिष नव्हताच असा दावा अजय मिश्रा यांनी यापूर्वी केला आहे. तो इतरत्र एका कार्यक्रमाला उपस्थित होता याचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजय मिश्रा टेनी यांनी "माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन" असं म्हटलं आहे. 

"मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस तयार"

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला. यावेळी त्याने आपली बाजू मांडताना आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला आहे. तसेच मी तिथे असतो तर आज जिवंत नसतो, असा दावा केला आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये लखीमपूर खीरी हिंसाचाराबाबत आशिष मिश्रा याने स्वत:चा बचाव केला आहे. तो म्हणाला की, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस तयार आहे. ईश्वराचा आशीर्वाद म्हणून सुदैवाने मी तिथे नव्हतो. जर तिथे असतो तर आज मी इथे तुमच्यासमोर नसतो.

"जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या गावात होतो"

लखीमपूरमधील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपण घटनास्थळी नसल्याचा दावा तो करत आहे. तो म्हणाला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या गावात होतो. तिकोनिया येथे गेलो नव्हतो. आमच्या तीन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आले. तर ड्रायव्हरला जळत्या गाडीत ढकलण्यात आले. भारतातील शेतकरी असं करू शकत नाही. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून 25 सप्टेंबर रोजी हे आंदोलन सुरू झाले होते. एका कार्यक्रमाला जाताना अजय मिश्रा यांना आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच सुधरावं, अन्यथा त्यांना सुधारले जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून केंद्रीय मंत्र्यांविरोधात आंदोलन सुरू आहे.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारIndiaभारतPoliceपोलिसFarmers Protestशेतकरी आंदोलन