शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केंद्रीय मंत्र्यांना ओडिशात तीव्र विरोध; काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, गाडीवर अंडीही फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:57 IST

भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा ताफा बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले.

भुवनेश्वर: काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना चिरडल्याच्या प्रकरणांपासून चर्चेत आलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी ओडिशात पोहोचले असता, त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. ओडिशात दाखल झालेले गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना विमानतळाबाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या गाडीवर अंडीही फेकली.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहोचले होते. अजय मिश्रा टेनी यांचा ताफा भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजय मिश्रा यांना काळे झेंडे तर दाखवलेच, पण त्यांच्या गाडीवर अंडीही फेकली. 3 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना चिरडल्याचे प्रकरण झाले, त्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजय मिश्रा टेनी यांचा जोरदार विरोध केला.

लखीमपूर खेरीत काय घटलं ?3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे कथितरित्या अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने चार शेतकर्‍यांना चिरडल्याची घटना घडली. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर बऱ्याच दिवस बेपत्ता राहिल्यानंतर त्याने पोलिसांना आत्मसमर्पण केले. त्या घटनेच्या विरोधात देशभरात शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. तसेच, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणीही शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आली.

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपाLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारcongressकाँग्रेस