शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Lakhimpur kheri: लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, आशिष मिश्राचा जामीन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:34 IST

Lakhimpur kheri: लखीमपूर खेरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) मोठा निर्णय आला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला आशिष मिश्राला जामीन मंजूर केला होता. तसेच, 18 फेब्रुवारीला तो तुरुंगातून बाहेर आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सोमवारी हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पीडितांना प्रत्येक कारवाईत सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. 

आशिष मिश्राला जामीन मंजूर करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडित पक्षाचे म्हणणे नीट ऐकले नाही आणि त्यांच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केले, असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ एका एफआयआरच्या आधारे आशिष मिश्राला जामीन मंजूर केला (ज्यात लखीमपूर खेरी हिंसाचारात गोळी लागल्याने कोणीही मरण पावले नाही असे म्हटले होते), जे चुकीचे आहे. आशिष मिश्राच्या जामीन याचिकेवर यापूर्वी सुनावणी करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करणार नाहीत, अशी तोंडी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

साक्षीदारावर जीवघेणा हल्ला16 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने यूपी सरकार आणि आशिष मिश्राला नोटीस बजावून जामीन का रद्द करू नये याविषयी उत्तर मागितले होते. साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावून साक्षीदारांच्या संरक्षणासाठी काय पावले उचलली आहेत यावर तपशीलवार उत्तर मागितले होते. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला सर्व साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देशही दिले होते. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय