शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Lakhimpur kheri: लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, आशिष मिश्राचा जामीन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:34 IST

Lakhimpur kheri: लखीमपूर खेरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) मोठा निर्णय आला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला आशिष मिश्राला जामीन मंजूर केला होता. तसेच, 18 फेब्रुवारीला तो तुरुंगातून बाहेर आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सोमवारी हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पीडितांना प्रत्येक कारवाईत सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. 

आशिष मिश्राला जामीन मंजूर करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडित पक्षाचे म्हणणे नीट ऐकले नाही आणि त्यांच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केले, असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ एका एफआयआरच्या आधारे आशिष मिश्राला जामीन मंजूर केला (ज्यात लखीमपूर खेरी हिंसाचारात गोळी लागल्याने कोणीही मरण पावले नाही असे म्हटले होते), जे चुकीचे आहे. आशिष मिश्राच्या जामीन याचिकेवर यापूर्वी सुनावणी करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करणार नाहीत, अशी तोंडी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

साक्षीदारावर जीवघेणा हल्ला16 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने यूपी सरकार आणि आशिष मिश्राला नोटीस बजावून जामीन का रद्द करू नये याविषयी उत्तर मागितले होते. साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावून साक्षीदारांच्या संरक्षणासाठी काय पावले उचलली आहेत यावर तपशीलवार उत्तर मागितले होते. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला सर्व साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देशही दिले होते. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय