शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली होणार ‘लखीमपूर खेरी’ची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 8:14 AM

सर्वोच्च न्यायालयाचा विचार : तपासाबाबत तीव्र नाराजी; राज्य सरकारचे मत मागविले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीबाबत उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या स्थितिदर्शक अहवालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या हिंसाचाराच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांतल्या उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार आहे. 

लखीमपूर खेरीमधील हिंसाचारात चार शेतकरी, एक पत्रकार यांच्यासह आठ जण ठार झाले होते. शेतकरी आंदोलकांवर वाहने घालून त्यांना चिरडण्यात आल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी आणखी काही साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय इतर कोणताही तपशील उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या स्थितिदर्शक अहवालामध्ये नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, लखीमपूर खेरी प्रकरणाच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांतील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार आहे. त्याबाबत उत्तर प्रदेश सरकारचे मत मागविण्यात आले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता शुक्रवारी होईल.  

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पुराव्यांचीही सरमिसळ होता कामा नये. तपासात कोणतीही उणीव राहू नये यासाठी त्यावर निवृत्त न्यायाधीशांकडून देखरेख ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेशकुमार जैन किंवा रणजितसिंग यांच्यापैकी कोणातरी एकाची नेमणूक करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचविले. 

इतरांचे मोबाइल का जप्त केले नाहीत?

लखीमपूर खेरी येथे पत्रकार रमण कश्यप हे शेतकरी आंदोलकांकडून नव्हे, तर वाहनाखाली चिरडले गेल्याने ठार झाले होते असे उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. आरोपी आशिष मिश्रा याच्याप्रमाणेच इतर आरोपींचेही मोबाइल फोन पोलिसांनी का जप्त केले नाहीत, असाही सवाल न्यायालयाने विचारला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय