शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

Lakhimpur Kheri: आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 06:32 IST

लखीमपूर प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही.

ठळक मुद्देआशिष मिश्रच्या सांगण्यावरूनच आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले असा आरोपआशिष मिश्रविरुद्धच्या एफआयआरची प्रत आपणास मिळावी आणि ऑटोप्सीचा अहवालही देण्यात यावाहा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागल्याने भाजपची अडचण झाली आहे.

लखीमपूर खिरी : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्या ताफ्यातील वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याच्या प्रकाराला दोन दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. 

चारही शेतकऱ्यांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम झाले असून, वाहनाने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यातून उघडकीस आले आहे. तसेच मंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन ठरवूनच शेतकऱ्यांच्या अंगावर घालून, त्यांना ढकलत नेऊन चिरडले, असा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागल्याने भाजपची अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकरीच वेगाने चाललेल्या वाहनाच्या समोर आल्याने अपघात झाला, असे ते सांगत आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतापले आहेत. मृत तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. तथापि, अन्य तीन मृत शेतकऱ्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आशिष मिश्रच्या सांगण्यावरूनच आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले, असा आरोप केला जात आहे. आशिष मिश्रविरुद्धच्या एफआयआरची प्रत आपणास मिळावी आणि ऑटोप्सीचा अहवालही देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केली. ही कागदपत्रे मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मृतावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, यासाठी पोलीस व प्रशासन दबाव आणत आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. 

लवप्रीत १९ वर्षांचालवप्रीत कामासाठी घरातून बाहेर पडला होता. काही वेळाने त्याचा रुग्णालयातून फोन आला. लवकर रुग्णालयात या, असे त्याने आपणास सांगितले. आम्ही लगेच रुग्णालयात गेलो. पण, तोपर्यंत माझा १९ वर्षांचा मुलगा मरण पावला होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. ते म्हणाले, ज्यांनी मुलास चिरडून ठार मारले, त्यांना आधी अटक झालीच पाहिजे. कशा पद्धतीने मुलाला मारण्यात आले, त्या घटनेचाव्हिडिओ समोर आला आहे. तरीही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारBJPभाजपा