शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Lakhimpur Kheri: आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 06:32 IST

लखीमपूर प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही.

ठळक मुद्देआशिष मिश्रच्या सांगण्यावरूनच आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले असा आरोपआशिष मिश्रविरुद्धच्या एफआयआरची प्रत आपणास मिळावी आणि ऑटोप्सीचा अहवालही देण्यात यावाहा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागल्याने भाजपची अडचण झाली आहे.

लखीमपूर खिरी : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्या ताफ्यातील वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याच्या प्रकाराला दोन दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. 

चारही शेतकऱ्यांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम झाले असून, वाहनाने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यातून उघडकीस आले आहे. तसेच मंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन ठरवूनच शेतकऱ्यांच्या अंगावर घालून, त्यांना ढकलत नेऊन चिरडले, असा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागल्याने भाजपची अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकरीच वेगाने चाललेल्या वाहनाच्या समोर आल्याने अपघात झाला, असे ते सांगत आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतापले आहेत. मृत तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. तथापि, अन्य तीन मृत शेतकऱ्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आशिष मिश्रच्या सांगण्यावरूनच आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले, असा आरोप केला जात आहे. आशिष मिश्रविरुद्धच्या एफआयआरची प्रत आपणास मिळावी आणि ऑटोप्सीचा अहवालही देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केली. ही कागदपत्रे मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मृतावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, यासाठी पोलीस व प्रशासन दबाव आणत आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. 

लवप्रीत १९ वर्षांचालवप्रीत कामासाठी घरातून बाहेर पडला होता. काही वेळाने त्याचा रुग्णालयातून फोन आला. लवकर रुग्णालयात या, असे त्याने आपणास सांगितले. आम्ही लगेच रुग्णालयात गेलो. पण, तोपर्यंत माझा १९ वर्षांचा मुलगा मरण पावला होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. ते म्हणाले, ज्यांनी मुलास चिरडून ठार मारले, त्यांना आधी अटक झालीच पाहिजे. कशा पद्धतीने मुलाला मारण्यात आले, त्या घटनेचाव्हिडिओ समोर आला आहे. तरीही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारBJPभाजपा