शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'एवढ्या मोठ्या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार?';लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 12:53 IST

Lakhimpur Kheri Case: सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आणखी साक्षीदार गोळा करण्याचे, त्यांचे जबाब नोंदवण्याचे आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence)  येथील हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानेउत्तर प्रदेशला फटकारले. 'लखीमपूर खेरीमध्ये इतकी मोठी घटना घडली, शेतकऱ्यांना गाडीने चिरडून मारले आणि या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी/साक्षीदार का आहेत?' असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारला. तसेच, याप्रकरणी आणखी साक्षीदार गोळा करण्याचे, त्यांचे जबाब नोंदवण्याचे आणि त्यांना सुरक्षा देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, त्या दिवशी घटनास्थळी चार-पाच हजार लोक होते. घटनेनंतर चौकशीची मागणी करणारे लोक मोठ्या संख्येने होते. पण, साक्ष देण्यासाठी फक्त 23 लोकच समोर का आले ? त्या दिवशी चार-पाच हजार लोक होते, त्यातील सर्वजण पुढे येऊ शकत नाहीत. पण, बरेच जण समोर येऊन साक्ष देऊ शकतात असेही कोर्टाने म्हटले. 

लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर शेतकर्‍यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, या प्रकरणात एकूण 68 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. त्यापैकी 30 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापैकी 23 जणांनी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.

यूपी सरकारला सवाल करत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात आणखी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची चौकशी का केली नाही, असा सवाल केला. तुम्ही आतापर्यंत 44 पैकी फक्त 4 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत, आणखी का नाही? असेही कोर्टाने म्हटले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला सर्व प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवण्याचे आणि सर्वांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश