शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

'एवढ्या मोठ्या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार?';लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 12:53 IST

Lakhimpur Kheri Case: सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आणखी साक्षीदार गोळा करण्याचे, त्यांचे जबाब नोंदवण्याचे आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence)  येथील हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानेउत्तर प्रदेशला फटकारले. 'लखीमपूर खेरीमध्ये इतकी मोठी घटना घडली, शेतकऱ्यांना गाडीने चिरडून मारले आणि या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी/साक्षीदार का आहेत?' असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारला. तसेच, याप्रकरणी आणखी साक्षीदार गोळा करण्याचे, त्यांचे जबाब नोंदवण्याचे आणि त्यांना सुरक्षा देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, त्या दिवशी घटनास्थळी चार-पाच हजार लोक होते. घटनेनंतर चौकशीची मागणी करणारे लोक मोठ्या संख्येने होते. पण, साक्ष देण्यासाठी फक्त 23 लोकच समोर का आले ? त्या दिवशी चार-पाच हजार लोक होते, त्यातील सर्वजण पुढे येऊ शकत नाहीत. पण, बरेच जण समोर येऊन साक्ष देऊ शकतात असेही कोर्टाने म्हटले. 

लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर शेतकर्‍यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, या प्रकरणात एकूण 68 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. त्यापैकी 30 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापैकी 23 जणांनी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.

यूपी सरकारला सवाल करत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात आणखी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची चौकशी का केली नाही, असा सवाल केला. तुम्ही आतापर्यंत 44 पैकी फक्त 4 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत, आणखी का नाही? असेही कोर्टाने म्हटले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला सर्व प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवण्याचे आणि सर्वांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश