शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 12:01 IST

लडाखमधील भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढलेला आहे. मात्र यावरुन देशात काँग्रेस आणि भाजपात राजकारण सुरु झालं आहे. मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लडाखमध्ये चीनी सैन्याच्या घुसखोरीवरुन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लडाखमधील भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी काँग्रेसच्या राजवटीत भारताचा जो भूभाग गमावला होता त्याची यादीच दिली. यात अक्साई चीनपासून पैगनक आणि चबजी घाटी, दूमसारख्या प्रदेशांची नावे दिली आहेत. नामग्याल यांनी ट्विटमध्ये दोन फोटो पोस्ट केले आहेत. एकात त्यांचे उत्तर आहे तर दुसऱ्या देमचोक घाटीचा फोटो शेअर केला आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये हा प्रदेश चीनच्या ताब्यात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९६२ मध्ये काँग्रेसच्या काळात अक्साई चीन(३७ हजार २४४ किमी), यूपीए काळात २००८ मध्ये चुमूर परिसरातील तिया पैगनक आणि चाबजी घाटी(२५० मीटर) तसेच २००८ मध्येच चीनी सैन्याने देमजोकमध्ये जोरावर किल्ला उद्ध्वस्त केला.

त्याचसोबत २०१२ मध्ये पीएलएने ऑब्जर्विंग पॉईंट बनवला, १३ सिमेंटच्या घरांसह चीनी, न्यू देमजोक कॉलनी बसवण्यात आली. यूपीएच्या काळात भारताने दुंगटी आणि देमचोकमधील दूम चेले हा प्रदेश गमावला.

नामग्याल यांच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांनी दुसरं ट्विट केले, त्यात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, चीनने घुसखोरी करत लडाखमधील आपली जमीन ताब्यात घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले, गायब झाले असा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधीसह अनेक काँग्रेस नेते चीनच्या घुसखोरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राहुल गांधींनी खापर फोडलं. शहा एका वर्चुअर रॅलीत म्हणाले, भारताची संरक्षणनीती जगात स्वीकारली जात आहे. संपूर्ण जगाचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि इस्त्राईल नंतर आपल्या सीमांचे रक्षण करू शकेल असा कोणता देश असेल तर तो भारत आहे. त्यावर कॉंग्रेस खासदाराने मिर्झा गालिब यांच्या शायरीत बदल करुन म्हटलं होतं की, सीमेचे वास्तव प्रत्येकाला ठाऊक आहे पण, मनाच्या समाधानासाठी 'शहा-याद' विचार करणं हे चांगलं आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा