शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 12:01 IST

लडाखमधील भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढलेला आहे. मात्र यावरुन देशात काँग्रेस आणि भाजपात राजकारण सुरु झालं आहे. मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लडाखमध्ये चीनी सैन्याच्या घुसखोरीवरुन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लडाखमधील भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी काँग्रेसच्या राजवटीत भारताचा जो भूभाग गमावला होता त्याची यादीच दिली. यात अक्साई चीनपासून पैगनक आणि चबजी घाटी, दूमसारख्या प्रदेशांची नावे दिली आहेत. नामग्याल यांनी ट्विटमध्ये दोन फोटो पोस्ट केले आहेत. एकात त्यांचे उत्तर आहे तर दुसऱ्या देमचोक घाटीचा फोटो शेअर केला आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये हा प्रदेश चीनच्या ताब्यात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९६२ मध्ये काँग्रेसच्या काळात अक्साई चीन(३७ हजार २४४ किमी), यूपीए काळात २००८ मध्ये चुमूर परिसरातील तिया पैगनक आणि चाबजी घाटी(२५० मीटर) तसेच २००८ मध्येच चीनी सैन्याने देमजोकमध्ये जोरावर किल्ला उद्ध्वस्त केला.

त्याचसोबत २०१२ मध्ये पीएलएने ऑब्जर्विंग पॉईंट बनवला, १३ सिमेंटच्या घरांसह चीनी, न्यू देमजोक कॉलनी बसवण्यात आली. यूपीएच्या काळात भारताने दुंगटी आणि देमचोकमधील दूम चेले हा प्रदेश गमावला.

नामग्याल यांच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांनी दुसरं ट्विट केले, त्यात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, चीनने घुसखोरी करत लडाखमधील आपली जमीन ताब्यात घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले, गायब झाले असा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधीसह अनेक काँग्रेस नेते चीनच्या घुसखोरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राहुल गांधींनी खापर फोडलं. शहा एका वर्चुअर रॅलीत म्हणाले, भारताची संरक्षणनीती जगात स्वीकारली जात आहे. संपूर्ण जगाचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि इस्त्राईल नंतर आपल्या सीमांचे रक्षण करू शकेल असा कोणता देश असेल तर तो भारत आहे. त्यावर कॉंग्रेस खासदाराने मिर्झा गालिब यांच्या शायरीत बदल करुन म्हटलं होतं की, सीमेचे वास्तव प्रत्येकाला ठाऊक आहे पण, मनाच्या समाधानासाठी 'शहा-याद' विचार करणं हे चांगलं आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा