शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:31 IST

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते.

जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवान दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम चालू केली आहे. मुकेश कुमार असे मृताचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो काही काळ पुलवामा येथे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता.

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नौपुरालगतच्या टुममध्ये आज दुपारी सव्वा एक वाजता स्थानिक लोकांनी गोळी झाडण्याचा आवाज ऐकला. स्थानिक लोकांनी जेव्हा त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा त्यांनी एक तरुण मृतवस्थेत पडलेला दिसला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. 

या घटनेची माहिती पोलीस आणि निमलष्करी दलाचे पथकला देण्यात आली होती. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मृत्यू झालेल्या मजुराच्या साथीदारांचीही चौकशी करण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी मुकेशची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलीस निरीक्षकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी हे ईदगाह मैदानात काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होते, तेव्हा काही दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांना गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

"गेल्या पाच वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये घट"दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दावा केला होता की, केंद्रशासित प्रदेशात गेल्या पाच वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या पाच वर्षात ऑपरेशन्स दरम्यान कोणतेही कोलेट्रल डॅमेज झाले नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. या पाच वर्षांत पोलिसांच्या कारवाईत एकही नागरिक जखमी झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते. तसेच, या वर्षात आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ३० घटना घडल्या आहेत, असेही दिलबाग सिंह यांनी सांगितले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी