शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Kushinagar Incident : 'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:58 IST

Kushinagar Incident : एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्न मंडपात लग्नाच्या विधी सुरू असताना काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री अनेक महिला व मुली एका विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्यानं काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र मोठ्या संख्येने आलेल्या महिलांमुळे जास्त वजन पडल्यानं स्लॅब खाली कोसळला त्यामुळे सर्व महिला विहिरीत पडल्या.या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. काही लोकांनी इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. 

जवळपास दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करत होतो पण...

विहिरीत महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु 13 महिलांचा मृत्यू झाला. या घटनेने कोणी आपली आई तर कोणी मुलगी गमावली आहे. लग्न मंडपात उपस्थित असलेल्या काही लोकांनी नेमकं काय घडलं त्याबाबत आता माहिती दिली आहे. मदतीसाठी रुग्णवाहिकेला 10 वेळा फोन केला. पण मदतीसाठी रुग्णवाहिका काही वेळेत पोहोचली नाही. खरं तर परिसरापासून रुग्णालय फक्त तीन किलोमीटरवर आहे. जवळपास दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करत होतो. पण फोनवर प्रत्येक वेळी रुग्णवाहिका आता येतेच आहे असं उत्तर मिळत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. 

संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. तसेच जखमी झालेल्या काही महिलांना पोलिसांच्याच गाडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस