शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

अर्थसंकल्पाचे 'करनाटक'; कहाणी अर्थखाते सांभाळणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 16:59 IST

जर कोणी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला तर मी काय करु? कुमारस्वामींचा काँग्रेसला प्रश्न

बंगळुरु- कर्नाटक निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचं महानाट्य घडल्यानंतर काँग्रेसच्या मदतीने कुमारस्वामी यांनी सरकार स्थापन केले खरे. पण या महिन्याभराच्या काळात त्यांच्या सरकारला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या काँग्रेसच्या सरकारला गेली पाच वर्षे प्रत्येक निर्णयाच्यावेळेस विरोध केला त्या काँग्रेसच्या मदतीशिवाय कुमारस्वामी यांना चालणे मुश्किल झाले आहे.फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्प सादर केला होता, आता कुमारस्वामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तीन महिन्यांपुर्वी एकमेकांविरोधात असणाऱ्या दोन पक्षांना आता एकत्र येऊन नवा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. सिद्धरामय्या यांनी आता नवा पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची गरज नाही केवळ पुरवणी अर्थसंकल्प मांडला तरी पुरे आहे असे सुचवल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नवा पेच निर्माण झाला आहे.

''अर्थसंकल्पाबाबत बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी काँग्रेस व जेडीएस या आघाडीत मतभेद आहेत मात्र आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहोत. आम्हाला पाठिंबा देतानाच काँग्रेसने पाच वर्षे सरकार चालवू असे आश्वासन दिले होते'', असे सांगत कुमारस्वामी यांनी सरकार जगवण्याची सर्व जबाबदारी काँग्रेसवर ढकलली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केलेली नाराजी एका क्लीपमधून वायरल झाल्यावर कुमारस्वामी यांनी आपली बाजू मांडली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी 5 जुलै तारिख निश्चित करण्यात आलेली आहे.

 ''मी अर्थसंकल्पाचा मुद्दा अत्यंत गांभिर्याने घेतला आहे.  या आघाडी सरकारमधील काही सदस्य अर्थसंकल्पाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करायचा की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. गेल्यावेळेस जेव्हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला (फेब्रुवारी) तेव्हाचे जवजवळ 100 आमदार आता पराभूत झालेले आहेत तसेच तेव्हा सभागृहात नसणारे जवळजवळ तितकेच नवे सदस्य आता निवडून आले आहेत. या नव्या सदस्यांना फेब्रुवारीतील अर्थसंकल्पाबाबत काहीही माहिती नाही. जर त्या पराभूत झालेल्या आमदारांनी तेव्हा संमत केलेल्या अर्थसंकल्पालाच पुढे सुरु ठेवत मतदान घेतले तर नव्या आमदारांच्या विशेषाधिकारांचा भंग होईल'' अशा स्पष्ट शब्दांमध्ये कुमारस्वामी यांनी भूमिका मांडली आहे. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्थखाते सांभाळत होते आता कुमारस्वामी हे स्वतः अर्थखाते सांभाळत आहेत. ''जर कोणी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला तर मी काय करु? '' असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.''मी सध्या दररोज अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत आहेत. या सरकारमध्ये 75 टक्के मंत्री नवे आहेत. जुन्या मंत्र्यांना नवी खाती मिळालेली आहेत, त्या सगळ्यांची अर्थसंकल्पाबाबत वेगळ्या भूमिका असू शकतात'',  असे सांगत त्यांनी काँग्रेस व सिद्धरामय्या यांचं नाव न घेता आपली बाजू मांडली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीsiddaramaiahसिद्धरामय्याJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस