शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

कुमार विश्वास यांचा केजरीवालांवर हल्लाबोल; दहशतवादी संघटनांचे सहानुभूतीदार तुमच्या घरी यायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 07:08 IST

Punjab Election 2022: कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

नवी दिल्ली : “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणी दहशतवादी म्हटलेले नाही. तुम्ही फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या की दहशतवादी संघटनांचे सहानुभूतीदार गेल्या निवडणुकीच्या आधी तुमच्या घरी येत होते की नाही, असा प्रश्न माजी आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी विचारला आहे. 

विश्वास म्हणाले,“मी त्या गोष्टींना आक्षेप घेतल्यावर मला पंजाबमधील बैठकांतून काढून टाकले गेले आणि त्यानंतर मी अशी एक बैठक रंगेहाथ पकडली होती. या बैठकीबाहेर हरयाणातील सुरक्षारक्षकाचा पहारा होता. आणि जेव्हा मला बैठकीला तेच लोक उपस्थित असल्याचे आढळल्यावर मला सांगण्यात आले की ‘इसका बडा फायदा होगा’. कुमार विश्वास यांनी म्हटले होते की, “अरविंद केजरीवाल यांनी मला एके दिवशी म्हटले होते की, एक दिवस मी पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र देशाचा (खलिस्तान) पंतप्रधान बनेन.”कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. चन्नी यांनी ट्विटरवर म्हटले की,“ राजकारण बाजूला ठेवा, पंजाबमधील जनतेने फुटीरवादाशी लढताना मोठी किमत मोजली आहे. प्रत्येक पंजाबीला वाटणाऱ्या काळजीचा माननीय पंतप्रधानांनी विचार करणे गरजेचे आहे.” 

सुरक्षेचा घेणार आढावाकुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा केंद्र सरकार घेत असून त्यांना केंद्रीय संस्थेकडून सुरक्षा दिली जाऊ शकते, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी म्हटले. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात असताना कुमार विश्वास यांनी केजरीवाल हे फुटिरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केलेला आहे. राज्यात २० फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.

आरोप हास्यास्पद -अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचे आणि शाळांच्या इमारती आणि रुग्णालये बांधणारा मी जगातील सर्वात मोहक दहशतवादी असलो पाहिजे, असे म्हटले. केजरीवाल म्हणाले, “भगत सिंग यांना ब्रिटिश दहशतवादी म्हणाले होते, परंतु, भगत सिंग यांच्यापेक्षा मोठा देशभक्त कोणी नाही हे देशाला माहीत आहे. “नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, चरणजित सिंग चन्नी, सुखबीर बादल, अमरिंदर सिंग, नवज्योत सिंग सिद्धू हे सगळे केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून देशाला तोडण्याचा कट रचत असून, एका भागाचा पंतप्रधान व्हायची त्यांची इच्छा असल्याचा आरोप करीत आहेत. हे आरोप खरे असतील तर मला अटक का करण्यात आली नाही.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल