शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

Kuldeep Nayyar Death : मोदींनी प्रशंसा केल्यानंतर नय्यरही झाले होते चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:54 IST

नय्यर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1923 रोजी सियालकोटमध्ये झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सक्रीय होते, आपली मते मांडत होते.

नवी दिल्ली- ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे काल रात्री दिल्ली येथे निधन झाले. गेली आठ दशके कुलदीप नय्यर विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय होते. धर्मनिरपेक्ष विचारांच्या नय्यर यांनी रा. स्व. संघ आणि भाजपाच्या विचारधारेवर नेहमीच टीका केली होती. मात्र जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात त्यांची प्रशंसा केल्यावर मात्र ते चकीत झाले होते.नय्यर यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नय्यर यांनी देशाला महान बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील अशा भावना त्यांनी ट्वीटरवर व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनीही ट्वीटरवरून नय्यर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नय्यर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1923 रोजी सियालकोटमध्ये झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सक्रीय होते, आपली मते मांडत होते. नय्यर यांनी अनेक राजकीय प्रश्नांवर भाष्य केले होते.  बांगलादेश निर्मितीच्यावेळेस स्थानिकांवर झालेले अत्याचार असो वा अण्णा हजारे यांचे आंदोलन, ते व्यक्त होत राहिले. अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे वादही निर्माण झाले. बियाँड द लाइन्स, इंडिया अफ्टर नेहरु, वॉल ऑफ वाघा, द जजमेंट, द मार्टियर, इंडिया पाकिस्तान रिलेशन अशी १५ पुस्तके त्यांनी लिहिली.26 जून 1975 रोजी भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी या दिवशी आणीबाणीच्या काळामध्ये झालेल्या घटनांवर विचार करण्यासाठी देशभरात कार्यक्रम केले जातात. याचसंदर्भातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुलदीप नय्यर आणि रामनाथ गोयनका यांची प्रशंसा केली होती.,' त्यांच्यासारख्या लोकांनी माझ्यावर अनेकदा टीका केली आहे मात्र त्यांनी लोकशाहीसाठी लढा दिला आहे, त्यासाठी मी त्यांना सलाम करतो' असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते. 

यानंतर कुलदीप नय्यर यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना आपण नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचे सांगून त्यांच्यावर टीका करतो हेसुद्धा मान्य केले होते. 'यामध्ये काहीही वैयक्तीक नाही. हा सगळा विचारधारेचा मुद्दा आहे. ते हिंदुत्त्वावर विश्वास ठेवतात आणि मी त्याविरोधात आहेत. मी अत्यंत सेक्युलर आहे', असे मत त्यांनी मांडले होते.नय्यर यांनी भारतातील सध्याच्या काळाची तुलना आणीबाणीशी केली होती. भारतातील माध्यमांची स्थिती पाहून आपण हे वक्तव्य करत आहोत असे मत त्यांनी मांडले होते. माध्यमं ज्याप्रकारे प्रचाराला पाठिंबा देत आहेत त्यामुळे हे आणीबाणीचे संकेत आहेत असे ते म्हणायचे.भारतीय जनता पार्टीने संपर्क फॉर समर्थन हा कार्यक्रम हाती घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून कोणते कार्य केले आहे याची माहिती देण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह स्वतः विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. 9 जून रोजी त्यांनी कुलदीप नय्यर यांची भेट घेतली होती व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली होती. या मुलाखतीनंतर नय्यर यांनी आमचे विचार जुळत नाहीत. 'आमचे विचार वेगवेगळे आहेत. मात्र आम्ही अनेक विषयांवर विचारांचे आदानप्रदान केले', असे सांगितले होते.

या भेटीवर अमित शाह ट्वीटमधून आपले मत स्पष्ट केले होते.' संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत प्रसिद्ध पत्रकार व राज्यसभेचे माजी सदस्य श्री कुलदीप नय्यरजी यांना मी भेटलो. या वयात देखिल त्यांच्या ऊर्जावान व्यक्तीमत्त्वाला पाहून प्रसन्न वाटले. गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक परिवर्तनकारक कामे केली त्यावर मी त्यांच्याशी चर्चा केली.' असे ट्वीट त्यांनी केले होते.

 

टॅग्स :Kuldeep Nayyarकुलदीप नय्यरNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा