शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

Kolkata Doctor Case : ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 08:58 IST

Kolkata Doctor Case Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांना सर्व काही माहीत होतं. त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ चाचणीही झाली पाहिजे. ममता यांना अटकही झाली पाहिजे, जेणेकरून सत्य बाहेर येईल असं भाटिया म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा दाखला देत भारतातील लोकशाही शरमेने झुकली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर ते विचारू इच्छितात की ममता बॅनर्जी यांना अजूनही त्यांच्या पदावर राहायचं आहे का?

आता निष्पक्ष चौकशीसाठी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा. ममता बॅनर्जी यांना सर्व काही माहीत होतं. गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आणि पुरावे नष्ट करण्यात त्यांचा सहभाग होता, त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ चाचणीही झाली पाहिजे आणि ममता यांना अटकही झाली पाहिजे, जेणेकरून सत्य बाहेर येईल असं भाटिया म्हणाले.

आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणावरील सुनावणी दोन तास चालली. आजच्या सुनावणीत एका बाजूला संविधानाचे रक्षक आणि दुसरीकडे संविधानाचे भक्षक यांच्यात लढाई झाली. पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं त्यांना योग्य वाटलं नाही असं गौरव यांनी सांगितलं. आमचे डॉक्टर आणि महिलांचा सरकारवर विश्वास असला पाहिजे, तुम्ही त्यांना सुरक्षा द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्यावर आहे. आता त्या काय करणार हा मोठा प्रश्न आहे असंही म्हटलं. 

राहुल गांधींच्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गौरव भाटिया म्हणाले की, राहुल गांधी हे अपरिपक्व आणि पार्ट टाईम नेते आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, पण विरोधी पक्षनेते झाल्यानंतर जनतेने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. पण, आज खेदाने म्हणावे लागेल की, राहुल गांधी हे भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग आहेत. परदेशात गेल्यावर काय बोलावे तेही कळत नाही. ज्या संविधानाला घेऊन ते फिरतात ते त्यांनी कधीच वाचले नाही असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीCrime Newsगुन्हेगारी