शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुसळधार पावसामुळे केरळमधील कोची विमानतळ बंद, मृतांची संख्या 45वर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:35 AM

केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

कोची- केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्यानं अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहेत. तर या पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. पेरियार नदीवरच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कोची विमानतळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपर्यंत या विमानतळावरून कोणतंही विमान उड्डाण होणार नाही.मुन्नारमध्ये अतिवृष्टीमुळे एक इमारत कोसळली असून, त्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 मुलं या दुर्घटनेतून सुखरूप बचावली आहेत. तर गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसानं 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोची विमानतळ परिसरातही मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळेच आजपासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रभावित झाली आहेत. पेरियार, इडुक्की आणि चेरुथोनी धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं हे विमानतळ बंद करण्यात आलं आहे.या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. एर्नाकुलम, त्रिशूर आणि वयानड जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या भागात रेड अलर्टही जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील पोलीस, एनडीआरएफ, लष्कर आणि काही संघटनांकडून पूरग्रस्त भागातील लोकांची मदत करण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर