शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नव्या नेत्याची एन्ट्री; कोण आहेत केएन त्रिपाठी? जाणून घ्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 19:32 IST

KN Tripathi : त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी रंजक बनत आहे. पहिल्यांदा अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह आणि नंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्या एन्ट्रीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होईल, असे म्हटले जात होते. पण, आता अशाच एका नेत्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा कोणालाच अंदाज नव्हता. आता झारखंड सरकारचे माजी मंत्री केएन त्रिपाठीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.

त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. "मी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, त्याचा आदर केला जाईल", असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्रिपाठी म्हणाले. विशेष म्हणजे त्रिपाठी राजकारणात येण्यापूर्वी हवाई दलात होते. 2005 मध्ये त्यांनी लष्कराची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पहिल्यांदाच डालटनगंज मतदारसंघातून निवडणूक लढवली. याठिकाणी त्यांचा इंदरसिंग नामधारी यांच्याकडून पराभव झाला. 2009 मध्ये काँग्रेसने त्यांना पुन्हा डालटनगंज मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी ते विजयी झाले. आमदार झाल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री करण्यात आले.

त्रिपाठी एका शेतकरी कुटुंबातील2014 मध्ये केएन त्रिपाठी यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. यावेळी त्यांचा जेव्हीएम उमेदवार आलोक चौरसिया यांच्याकडून 5000 मतांनी पराभव झाला. वडिलांच्या निधनामुळे आलोक चौरसिया यांना सहानुभूतीची मते मिळाल्याचे बोलले जाते. आमदार झाल्यानंतर आलोक चौरसिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, डालटनगंजच्या रेडमा काशी नगर परिसरातील रहिवासी केएन त्रिपाठी एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1972 रोजी बिश्रामपूरच्या टोलरा गावात झाला.

लष्कराची नोकरी सोडली आणि राजकारणात आलेत्रिपाठी यांनी प्राथमिक शिक्षण डालटनगंज येथील दशमेश मॉडेल स्कूलमधून केले. यानंतर त्यांनी जिल्हा शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. डालटनगंज जीएलए कॉलेजमधून इंटरमीडिएट आणि ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर केएन त्रिपाठी हवाई दलात दाखल झाले. बंगळुरू आणि सुरतगडमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि राजकारणात आले. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर 2000 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी कृष्णानंद त्रिपाठी एका सभेला उपस्थित होते. या सभेतून त्यांची राजकारणाकडे वाटचाल झाली. त्यांचे वडील पंडित जग नारायण त्रिपाठी हे शेतकरी होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण