शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:49 IST

चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे...

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या घटनेमुळे मोठा हाहाकार निर्माण झाला आहे. आतापर्यंत १२ जणांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हा आकडा आणखीही वाढण्याची भीती आहे. कारण, ज्या चिसोटी गावात ही घटना घडली, ते चिसोटी गाव मचैल माता यात्रेच्या मार्गावर येते. येथे मोठ्या संख्येने यात्रेकरू आपले बेस कॅम्प बनवून तंबू उभारतात. आताही येथे शेकडो बाहेरून आलेले लोक असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, गावातही मोठ्या प्रमणावर लोक राहतात. चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे.

या संदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, ते एक मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. अर्धे गाव वाहून गेल्याचे मी ऐकले आहे. याचा अर्थ मोठे नुकसान होण्याची भीती आहे. मी देशभरातील जनतेला, अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करेन. 

अब्दुल्ला पुढे म्हणाले, सध्या ज्या पद्धतीचे हवामान आहे, त्या परिस्थितीत हेलिकॉप्टरने बचावकार्य करणे अशक्य आहे. रुग्णवाहिकेनेच ऑपरेशन सुरू करावे लागेल. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे बचावकार्यातही अडचणी येतील. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानीची भीती -याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या घटनेबाबत मला जम्मू काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांनी माहिती दिली. त्यानंतर मी किश्तवाडचे उपायुक्त पंजक कुमार शर्मा यांच्याशी दुर्घटनेबाबत चर्चा केली. चिशोटी परिसरात ढगफुटीची मोठी घटना घडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असण्याची भीती आहे. बचाव पथकाला घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. तसेच झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठीही व्यवस्था केली जात आहे. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाRainपाऊसDeathमृत्यूJammu Kashmirजम्मू-काश्मीरfloodपूर