शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दोन कोटी शेतकऱ्यांचा किसान सन्मान निधी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:12 IST

राज्यांची कारवाई : चुकीची माहिती देऊन अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ

ठळक मुद्देही संख्या जवळपास २ कोटी असल्याचे समजते. यात अनेक पात्र शेतकऱ्यांची नावेही हटविली गेल्याच्या तक्रारी आता येत आहेत. विशेष म्हणजे, ४२ लाख अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अलीकडेच संसदेत दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माेदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएम शेतकरी सन्मान योजने’तील सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांचा निधी राज्य सरकारांनी रोखून धरला असल्याची माहिती आहे. अपात्र शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी आल्या होत्या. प्राप्तिकर भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडून या योजनेचे पैसे परतही घेण्यात आले होते. यात तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. पूर्वानुभव लक्षात घेऊन राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करून अनेकांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून हटविली आहेत. 

ही संख्या जवळपास २ कोटी असल्याचे समजते. यात अनेक पात्र शेतकऱ्यांची नावेही हटविली गेल्याच्या तक्रारी आता येत आहेत. विशेष म्हणजे, ४२ लाख अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अलीकडेच संसदेत दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी सावध भूमिका घेतली असून, त्याचा फटका काही पात्र शेतकऱ्यांना बसत असल्याची तक्रार आहे.

nप्राप्त माहितीनुसार, या योजनेचा १२.१४ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत असून, योजनेचा ९वा हप्ता सरकारने नुकताच जारी केला आहे. ऑगस्ट-नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील २ हजार रुपये १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तथापि, दोन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत, अशी माहिती ‘पीएम किसान पोर्टल’वर देण्यात आली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना