शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

Akhilesh Yadav: सत्ता येताच शेतकरी आंदोलनातील 'शहीदां'च्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख देणार, अखिलेश यादव यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:04 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेऊन मोठा उलटफेर केला

लखनऊ-

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेऊन मोठा उलटफेर केला. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटनं बुधवारी मंजुरी देखील दिली आहे आणि हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब देखील होणार आहे. भाजपानं कृषी कायदे मागे घेत विरोधकांच्या हातातून एक मोठा मुद्दाच खेचून घेतला आहे. यात आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी मोठी राजकीय खेळी केली आहे. 

अखिलेश यादव यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. अखिलेश यादव यांनी यासंदर्भाती एक ट्विट आज केलं आहे. "शेतकऱ्यांचं आयुष्य अतिशय अमूल्य असतं. कारण 'अन्य' लोकांच्या आयुष्यासाठी 'अन्न' पीकवण्याचं काम शेतकरी करतात. आम्ही वचन देतो की २०२२ मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार येताच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केली जाईल. 'शेतकरी शहादत सन्मान राशी' योजनेअतंर्गत ही मदत केली जाईल", असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे. 

आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावातीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केंद्रानं केल्यानंतर शेतकरी आंदोलात आपला जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. कृषी कायद्यांविरोधात मोर्चा उघडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चानं कायदेमागे घेण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे. यात कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या माहितीनुसार गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ७०० शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची आणि मदतीची व्यवस्था सरकारनं करावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. यासोबतच शहीद शेतकऱ्यांच्या स्मृतीसाठी सिंघू बॉर्डरवज एक शहीद स्मारक बनवण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांविरोधात आंदोलन केल्यामुळे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवFarmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलन