शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बाबांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू; मुलींनी अधिकारी होऊन घेतला बदला, 31 वर्षांनी मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:23 IST

मुली आईसोबत न्याय मागत सर्वठिकाणी फिरत होत्या. याच दरम्यान आईचाही मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशातील बलिया येथे राहणाऱ्या दोन बहिणींचे आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यांच्या संघर्षाची कल्पनाही करवत नाही. वडील पोलिसांत होते आणि एका चकमकीदरम्यान त्यांच्याच टीममधील पोलिसांनी त्यांना मारलं होतं. यानंतर मुली आईसोबत न्याय मागत सर्वठिकाणी फिरत होत्या. याच दरम्यान आईचाही मृत्यू झाला. 

बहिणींनी स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. अभ्यास पूर्ण केला आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. सरकारी अधिकारी बनून त्यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. IAS किंजल सिंह आणि IRS प्रांजल सिंह यांची गोष्ट अनेकांना प्रेरित करू शकते. किंजल सिंह सध्या यूपीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महासंचालक आहेत.

केपी सिंह हे DSP म्हणून कार्यरत होते. त्याच्या साथीदारांनी त्यांना उत्तर प्रदेशातील गोंडा येथील एका बनावट चकमकीत मारले. त्यावेळी त्यांची पत्नी विभा सिंह या गरोदर होत्या. मोठी मुलगी किंजल सिंह ही फक्त 2 वर्षांची होती. प्रसूतीनंतर विभा सिंहने आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशन आणि कोर्टात फेऱ्या मारण्यास सुरुवात केली.

विभा सिंह यांना पतीच्या जागी वाराणसीच्या ट्रेजरी ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. विभा सिंह या दोन्ही मुलींना कडेवर घेऊन दिल्लीतील सीबीआय कोर्टात जात होत्या. त्यांच्या पगाराचा मोठा भाग प्रवास आणि वकिलाच्या फीवर खर्च होऊ लागला. तेव्हा त्यांनी आपल्या मुलींना सरकारी अधिकारी बनवायचे ठरवले होते.

2004 मध्ये आईचं निधन

12वी उत्तीर्ण झाल्यानंतर किंजल सिंहने दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या सेमिस्टरमध्येच तिला कळलं की त्याची आई कॅन्सरने ग्रस्त आहे. जेव्हा आईची प्रकृती बिघडू लागली तेव्हा किंजलने तिला वचन दिले की ती आयएएस अधिकारी होईल आणि तिच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षाही देईल. 2004 मध्ये आईचं निधन झाले.

आई विभा सिंहच्या निधनानंतर किंजलने तिची बहीण प्रांजल सिंह हिलाही दिल्लीला बोलावले. दोन्ही बहिणींनी अभ्यासासोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2008 मध्ये, किंजल सिंह तिच्या दुसऱ्या प्रयत्नात 25 व्या क्रमांकासह आयएएस अधिकारी बनली. त्याच वर्षी त्याच्या बहिणीची आयआरएससाठी निवड झाली. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर दोन्ही बहिणींना वडिलांना न्याय मिळू लागला.

31 वर्षांनंतर मिळाला न्याय 

सरकारी अधिकारी झाल्यानंतर किंजल सिंहने वडिलांना न्याय मिळवून देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. दोन्ही बहिणींनी ही केस लढली. त्याच्या निर्धाराने न्याय व्यवस्थेला हादरवून सोडले. अखेर 31 वर्षांनंतर 5 जून 2013 रोजी लखनौ सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डीएसपी केपी सिंह यांच्या हत्येप्रकरणी 18 पोलिसांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी