शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Khelratna : हे कामही फक्त मोदी सरकारच करू शकते, नामांतराचे गंभीरकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:22 IST

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देदेशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीच्याच नावे असायला हवा, असे म्हणत गंभीरने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात यावे, अशी मागणीही गंभीर यांनी केली

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचे नाव उंचावत पदके पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे. 

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध होत आहे. त्यानंतर, आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहेत. ट्विटरवर 'भारतरत्न' हा ट्रेंड सुरू असून भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीच्याच नावे असायला हवा, असे म्हणत गंभीरने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात यावे, अशी मागणीही गंभीर यांनी केली आहे. तसेच, हेही काम मोदी सरकारच करू शकते, असेही त्यांनी म्हटले   

मोदींनी ट्विट करुन दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीHockeyहॉकी