शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे म्हणणाऱ्या मोदींवर खर्गेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजपाला मिळणार केवळ एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 11:17 IST

Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेबाहेर जाणार असून, भाजपाला १०० जागासुद्धा मिळणार नाहीत, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की, बंगालमधून चॅलेंज आलंय की, यावेळी काँग्रेसला ४० जागादेखील मिळणार नाहीत. मी प्रार्थना करतो की, काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला टोला लगावताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अब की बार भाजपा सत्तासे पार, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तसेच भाजपा १०० जागासुद्धा निवडून येणार नाहीत. मोदींची गॅरंटी ही देशातील शेतकरी, दलित आणि मागासवर्गियांसाठी नाही आहे. तर ती मोदींच्या मित्रांसाठी आहे. ते केवळ कांघ्रेसला शिविगाळ करू शकतात. यावेळी उद्योगपतींच्या कर्जमाफीवरून खर्गे यांनी मोदींवर टीका केली. मोदींच्या मित्रांचं १३ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांना १२-१३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या कराव्या लागतात. मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये धानाचा किमान हमिभाव १३५ टक्क्यांनी वाढलं होतं. तर भाजपा सरकारच्या कार्यकाळात ही किंमत केवळ ५० टक्क्यांनी वाढली आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत बोलतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास किमान हमिभाव कायदा लागू केला जाईल, असं आश्वासन आम्ही देत आहोत, असेही खर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा