शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे म्हणणाऱ्या मोदींवर खर्गेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजपाला मिळणार केवळ एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 11:17 IST

Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेबाहेर जाणार असून, भाजपाला १०० जागासुद्धा मिळणार नाहीत, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की, बंगालमधून चॅलेंज आलंय की, यावेळी काँग्रेसला ४० जागादेखील मिळणार नाहीत. मी प्रार्थना करतो की, काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला टोला लगावताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अब की बार भाजपा सत्तासे पार, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तसेच भाजपा १०० जागासुद्धा निवडून येणार नाहीत. मोदींची गॅरंटी ही देशातील शेतकरी, दलित आणि मागासवर्गियांसाठी नाही आहे. तर ती मोदींच्या मित्रांसाठी आहे. ते केवळ कांघ्रेसला शिविगाळ करू शकतात. यावेळी उद्योगपतींच्या कर्जमाफीवरून खर्गे यांनी मोदींवर टीका केली. मोदींच्या मित्रांचं १३ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांना १२-१३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या कराव्या लागतात. मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये धानाचा किमान हमिभाव १३५ टक्क्यांनी वाढलं होतं. तर भाजपा सरकारच्या कार्यकाळात ही किंमत केवळ ५० टक्क्यांनी वाढली आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत बोलतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास किमान हमिभाव कायदा लागू केला जाईल, असं आश्वासन आम्ही देत आहोत, असेही खर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा