शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 21:17 IST

Farmer Protest : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही केली घुसखोरी ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेतहे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही घुसखोरी केली असल्याचा दावा काँग्रेसचे लुधियानामधील खासदार रवनीत बिट्टू यांनी केला आहे. ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेत, असा दावा बिट्टू यांनी केला आहे.रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जात आहे. हे कसलं पंजाब आहे. पंजाबमधील लोक असे करू शकत नाहीत. पंजाबमधील शेतकरी असं करू शकत नाही. ठोक देंगेसारखी भाषा पंजाबची नाही आहे. अशी भाषा बोलणारे असामाजिक आहेत. पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू अशी भाषा शेतकरी करू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. 

लुधियानामधील खासदार असलेल्या रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितले की, शेतकरी शांततेने आंदोलनाला बसले आहेत. तीन महिने पंजाबमध्ये आंदोलन सुरू असताना काही झाले नाही. पंजाब सरकारने हे आंदोलन शांततेने व्हावे, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच ते पन्नास हजार जण आहेत. हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आता नेत्यांनी पुढे येऊन यावर नियंत्रण नियंत्रण मिळवले पाहिजे कारण अनेक जण हे आंदोलन अपयशी करण्याच्या प्रयत्नात आहेत.हे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात. शेतकऱ्यांनाही तसेच वाटते. शेतकऱ्यांना ना कृषिमंत्र्यांवर विश्वास आहे. ना अन्य कुणावर, असेही बिट्टू यांनी सांगितले.रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे युवा नेते आहे. ते लुधियाना येथील खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसबा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. बेअंत सिंह यांची मुख्यमंत्री असताना हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकारPunjabपंजाबcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा