शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हद्द झाली राव... कोरोना बंद काळात दारुच्या होम डिलिव्हरीची याचिकेतून मागणी, कोर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 15:54 IST

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना कामापासून दूर ठेवण्यात येत आहे.

कोची : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र आणि सर्वच राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नुकताच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली. तर, गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महानगरातील बिअरबार आणि परमीट रुम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केरळमध्ये एका व्यक्तीने घरपोच बिअर किंवा दारुची उपलब्धता व्हावी, यासंदर्भात याचिका दाखल केली होती. 

देशातील बहुतांश राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वच सेवा आणि आस्थापनांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश राज्यात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केरळमधील एका व्यक्तीने बिअर किंवा दारुचा ऑनलाईन पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले असून ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती एके जयसंकरन नंबियार यांनी संबंधित ज्योतीशनामक याचिकाकर्त्यास ही शिक्षा सुनावली. तसेच पुढील २ आठवड्याात मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन निधी केंद्रात ही रक्कम जमा करण्याचेही बजावले आहे. 

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना कामापासून दूर ठेवण्यात येत आहे. न्यायालयातही  क्लर्क, वकिल, न्यायाधीश यांच्या कामकाज आणि वेळेत बदल झाला आहे. मात्र, अशी मागणी करणारी याचिका आल्याने, संबंधित याचिकाकर्त्यास परिस्थिती गांभिर्य आणि भान नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, या याचिकेबद्दल अतिशय संतापजनक भावनाही न्यायालयाने व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयKeralaकेरळliquor banदारूबंदी