शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

Kerala Floods; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', Paytm च्या मालकास नेटीझन्सने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 15:23 IST

Kerala Floods; केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी प्रार्थना केली जात असून देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे.

मुंबई - केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाऊस थांबण्यासाठी वरुणराजाला प्रार्थना केली जात आहे, तर दुसरीकडे देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे. या कामात दानशूर व्यक्तीही आपले कर्तव्य समजून पुढे येत आहेत. मात्र, पेटीएम कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांनी केरळच्या जनतेची खिल्ली उडविण्याचाच प्रयत्न केला आहे. जवळपास 12 हजार कोटींचे मालक असलेल्या शेखर यांनी 10 हजार रुपयांची तुटपूंजी मदत केरळसाठी दिली आहे. विशेष म्हणजे पेटीएमद्वारे ही मदत देताना त्यांनी मदतीसाठी लोकांना पेटीएमचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.  त्यामुळे आपल्या ब्रँडची जाहिरात करताना त्यांनी खालची पातळी गाठल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारने केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर केली असून इतर राज्यांनीही आपापल्यापरीने मदत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने 20 कोटींची मदत दिली. तर राज्यातील काँग्रेस आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. तसेच इतर राज्यातील इतर राजकीय पक्षांतील नगरसेवक ते खासदार सर्वच मदतीसाठी सरसावले आहेत. सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यक्तींकडूनही केरळला मदत करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमचे संस्थापक आणि देशातील मोठे उद्योजक असलेल्या विजय शेखर शर्मा यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 10 हजार रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे ही मदत त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून केली असून लोकांनीही पेटीएमचा वापर करुन मदत करावी, असे आवाहनही केले आहे. म्हणजेच, एकप्रकारे विजय शेखर यांनी केवळ 10 हजार रुपयांत स्वत:च्या कंपनीची लाखो रुपयांची जाहिरातच केली आहे. शर्मा यांनी केरळसाठी 10 हजार रुपये मदत केल्याचा स्क्रीनशॉटही ट्विटरवरुन शेअर केला. त्यानंतर, विजय शेखर यांनी नेटीझन्सने चांगलेच सुनावले आहे. 12 हजार कोटींची संपत्ती असलेल्या शर्मा यांनी केलेली तुटपूंजी मदत म्हणजे केरळवासियांची चेष्टाच असल्याचे युजर्संने म्हटले आहे. विशेष म्हणजे केवळ 48 तासांतच 4 लाख पेटीएम युजर्संने केरळसाठी पेटीएमद्वारे 10 कोटींचा निधी जमा केला आहे. मात्र, विजय शेखर यांनी 10 हजार दिल्याने युजर्सं चांगलेच खवळले आहेत. विजय शेखर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी एका आपत्कालीन घटनेचे सहाय्य घेणे अतिशय खालच्या स्तराचे काम असल्याचे हिमिका चौधरी नावाच्या युजर्सने म्हटले आहे. तर अनेक युजर्संनेही तशाच भाषेत विजय शेखर यांना सुनावले आहे. आमच्याकडे गणपतीची पट्टीही जास्त दिली जाते, तुम्ही अब्जाधीश असून केवळ 10 हजार रुपये देता, असेही नेटीझन्सने सुनावले आहे.  

 

दरम्यान, केरळमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला होता. मात्र, 9 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच हा रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. सरकार आणि एनडीआरएफची टीम मिळून बचावकार्य राबवत आहेत. एर्नाकुलम, पथनमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Paytmपे-टीएमAdvertisingजाहिरातTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाKerala Floodsकेरळ पूर