शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Kerala Floods; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', Paytm च्या मालकास नेटीझन्सने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 15:23 IST

Kerala Floods; केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी प्रार्थना केली जात असून देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे.

मुंबई - केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाऊस थांबण्यासाठी वरुणराजाला प्रार्थना केली जात आहे, तर दुसरीकडे देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे. या कामात दानशूर व्यक्तीही आपले कर्तव्य समजून पुढे येत आहेत. मात्र, पेटीएम कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांनी केरळच्या जनतेची खिल्ली उडविण्याचाच प्रयत्न केला आहे. जवळपास 12 हजार कोटींचे मालक असलेल्या शेखर यांनी 10 हजार रुपयांची तुटपूंजी मदत केरळसाठी दिली आहे. विशेष म्हणजे पेटीएमद्वारे ही मदत देताना त्यांनी मदतीसाठी लोकांना पेटीएमचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.  त्यामुळे आपल्या ब्रँडची जाहिरात करताना त्यांनी खालची पातळी गाठल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारने केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर केली असून इतर राज्यांनीही आपापल्यापरीने मदत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने 20 कोटींची मदत दिली. तर राज्यातील काँग्रेस आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. तसेच इतर राज्यातील इतर राजकीय पक्षांतील नगरसेवक ते खासदार सर्वच मदतीसाठी सरसावले आहेत. सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यक्तींकडूनही केरळला मदत करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमचे संस्थापक आणि देशातील मोठे उद्योजक असलेल्या विजय शेखर शर्मा यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 10 हजार रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे ही मदत त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून केली असून लोकांनीही पेटीएमचा वापर करुन मदत करावी, असे आवाहनही केले आहे. म्हणजेच, एकप्रकारे विजय शेखर यांनी केवळ 10 हजार रुपयांत स्वत:च्या कंपनीची लाखो रुपयांची जाहिरातच केली आहे. शर्मा यांनी केरळसाठी 10 हजार रुपये मदत केल्याचा स्क्रीनशॉटही ट्विटरवरुन शेअर केला. त्यानंतर, विजय शेखर यांनी नेटीझन्सने चांगलेच सुनावले आहे. 12 हजार कोटींची संपत्ती असलेल्या शर्मा यांनी केलेली तुटपूंजी मदत म्हणजे केरळवासियांची चेष्टाच असल्याचे युजर्संने म्हटले आहे. विशेष म्हणजे केवळ 48 तासांतच 4 लाख पेटीएम युजर्संने केरळसाठी पेटीएमद्वारे 10 कोटींचा निधी जमा केला आहे. मात्र, विजय शेखर यांनी 10 हजार दिल्याने युजर्सं चांगलेच खवळले आहेत. विजय शेखर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी एका आपत्कालीन घटनेचे सहाय्य घेणे अतिशय खालच्या स्तराचे काम असल्याचे हिमिका चौधरी नावाच्या युजर्सने म्हटले आहे. तर अनेक युजर्संनेही तशाच भाषेत विजय शेखर यांना सुनावले आहे. आमच्याकडे गणपतीची पट्टीही जास्त दिली जाते, तुम्ही अब्जाधीश असून केवळ 10 हजार रुपये देता, असेही नेटीझन्सने सुनावले आहे.  

 

दरम्यान, केरळमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला होता. मात्र, 9 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच हा रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. सरकार आणि एनडीआरएफची टीम मिळून बचावकार्य राबवत आहेत. एर्नाकुलम, पथनमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Paytmपे-टीएमAdvertisingजाहिरातTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाKerala Floodsकेरळ पूर