शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:29 IST

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर चढला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजप नेते मनोज तिवारी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. 

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

दिल्लीत शुक्रवारी जे काही झालं ते सर्वकाही 'आप'कडून घडवण्यात आले आहे. शाहीन बागेतील आंदोलन देशविरोधी झाले आहे. तेथूनच शरजील इमाम निघाला आणि तेथूनच अमानतुल्लाह खान आला आहे. गोळीबार करणार युवक यांचाच ('आप'चा) आहे. एवढ्या लवकर कोण कसकाय स्वत:ला भाजप समर्थक म्हणू शकतो, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.

दरम्यान केजरीवाल सरकारचा अंत होणार आहे. त्यामुळे ते अशा घटना घडवून आणत आहेत. गोळीबार करणारा युवक हा आम आदमी पक्षाकडूनच पाठविण्यात आला होता. कारण भाजप समर्थक कधीही अशी कृती करणार नाही, असंही तिवारी यांनी नमूद केले. आम्हाला दिल्लीत शांतता आणि सुरक्षा हवी आहे. मात्र त्यांच्याकडून दिल्लीत आग लावण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनताच निर्णय घेईल, त्यांना दिल्ली कशी हवी, असंही तिवारी म्हणाले.