शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:29 IST

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर चढला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजप नेते मनोज तिवारी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. 

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

दिल्लीत शुक्रवारी जे काही झालं ते सर्वकाही 'आप'कडून घडवण्यात आले आहे. शाहीन बागेतील आंदोलन देशविरोधी झाले आहे. तेथूनच शरजील इमाम निघाला आणि तेथूनच अमानतुल्लाह खान आला आहे. गोळीबार करणार युवक यांचाच ('आप'चा) आहे. एवढ्या लवकर कोण कसकाय स्वत:ला भाजप समर्थक म्हणू शकतो, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.

दरम्यान केजरीवाल सरकारचा अंत होणार आहे. त्यामुळे ते अशा घटना घडवून आणत आहेत. गोळीबार करणारा युवक हा आम आदमी पक्षाकडूनच पाठविण्यात आला होता. कारण भाजप समर्थक कधीही अशी कृती करणार नाही, असंही तिवारी यांनी नमूद केले. आम्हाला दिल्लीत शांतता आणि सुरक्षा हवी आहे. मात्र त्यांच्याकडून दिल्लीत आग लावण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनताच निर्णय घेईल, त्यांना दिल्ली कशी हवी, असंही तिवारी म्हणाले.