शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:29 IST

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर चढला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजप नेते मनोज तिवारी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. 

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

दिल्लीत शुक्रवारी जे काही झालं ते सर्वकाही 'आप'कडून घडवण्यात आले आहे. शाहीन बागेतील आंदोलन देशविरोधी झाले आहे. तेथूनच शरजील इमाम निघाला आणि तेथूनच अमानतुल्लाह खान आला आहे. गोळीबार करणार युवक यांचाच ('आप'चा) आहे. एवढ्या लवकर कोण कसकाय स्वत:ला भाजप समर्थक म्हणू शकतो, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.

दरम्यान केजरीवाल सरकारचा अंत होणार आहे. त्यामुळे ते अशा घटना घडवून आणत आहेत. गोळीबार करणारा युवक हा आम आदमी पक्षाकडूनच पाठविण्यात आला होता. कारण भाजप समर्थक कधीही अशी कृती करणार नाही, असंही तिवारी यांनी नमूद केले. आम्हाला दिल्लीत शांतता आणि सुरक्षा हवी आहे. मात्र त्यांच्याकडून दिल्लीत आग लावण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनताच निर्णय घेईल, त्यांना दिल्ली कशी हवी, असंही तिवारी म्हणाले.