शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:29 IST

Honeymoon couple goes missing sikkim : हनिमूनसाठी कौशलेंद्र आणि अंकिता सिक्कीमला गेले होते. पण, पहिल्याच दिवशी त्यांच्यासोबत दुर्घटना घडली. दोन आठवडे उलटले तरीही त्यांच्याबद्दल काही कळू शकलेलं नाही. 

Honeymoon couple goes missing News: राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील एक जोडपे सिक्कीमला गेल्यानंतर बेपत्ता झाले आहे. कौशलेंद्र प्रताप सिंह आणि अंकिता सिंह हे हनिमूनसाठी सिक्कीमला गेले. २४ मे रोजी ते सिक्कीमसाठी रवाना झाले होते. त्यानंतर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि तेव्हापासून त्यांच्याबद्दल काही कळू शकलेले नाही. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कौशलेंद्र आणि अंकिता २४ मे रोजी सिक्कीममध्ये गेल्यानंतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. मंगन जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या भागातच ही घटना घडली. कौशलेंद्र आणि अंकिता बसलेली गाडी १००० फूट खोल तीस्ता नदीत कोसळली. 

वाचा >>"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?

कौशलेंद्र आणि अंकिता ज्या कारने जात होते, लाचेन-लाचुंग महामार्गावरील मुन्सिथांगजवळ कार अपघातग्रस्त होऊन खाली कोसळली. त्यांच्या गाडीत काही लोक होते, त्यापैकी एका मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहे. तर आठ प्रवासी बेपत्ता आहेत. 

मुलगा आणि सुनेच्या शोधासाठी कौशलेंद्रचे वडील सिक्कीममध्ये  

शेर बहादूर सिंह हे मुलगा कौशलेंद्र आणि सून अंकिता यांच्या शोधासाठी आठवडाभरापासून सिक्कीममध्ये आहेत. 

त्यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्या म्हटले आहे की, "सिक्कीममध्ये एका नदी वाहन कोसळून माझा मुलगा आणि सून बेपत्ता झाले आहेत. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, त्यांनी सिक्कीमच्या अधिकाऱ्यांना शोध मोहिमेला वेग देण्यास सांगावे."

माझ्या मुलाची आणि सुनेची एकही वस्तू सापडली नाही

शेर बहादूर सिंह यांनी सांगितले की, "आठवा दिवस आहे. आम्ही कित्येक वेळा घटनास्थळी गेलो. घटनास्थळी ज्या वस्तू सापडल्या आहेत, त्यात माझ्या मुलाची किंवा सुनेची एकही वस्तू नाही. जोपर्यंत ते सापडत नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही. माझा मुलगा आणि सून सुखरुप असावी, यासाठी प्रार्थंना करा."

अपघातात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू असला, तरी त्यांच्याबद्दल कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. नदी आणि किनाऱ्यावर शोध घेतला जात आहे. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कौशलेंद्र आणि अंकिता ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्यात ११ लोक होते. त्यापैकी दोघे ओडिशाचे होते. सुप्रतिम नायक आणि साईराज जेना अशी त्यांची नावे आहेत. अपघात घडला, तेव्हाच दोघांना वाचवण्यात यश ले. 

बेपत्ता असलेल्या आठ पर्यटकांपैकी चार ओडिशाचे आहेत, तर उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा प्रत्येकी दोन पर्यटक आहेत. गाडीच्या चालकाचीही ओळख पटली असून, पासांग डेनू शेरपा असे त्याचे नाव आहे. 

टॅग्स :Accidentअपघातhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस