शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Corona Vaccine : कोरोना लसीमुळे नपुंसकता?; लोकांची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराचं अजब विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 16:10 IST

BJP Sanjay Pathak And Corona Vaccine : भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही अनेकांच्या मनात लसीबद्दल भीती असल्याने ते लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. याच दरम्यान लोकांची लसीकरणाबाबतची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराने एक अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कोरोना लसीवर (Corona Vaccine) पसरलेल्या अफवांच्या दरम्यानच मध्य प्रदेशातील कटनीच्या विजयराघवगडचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात ते म्हणाले, 'अनेक मूर्ख लोक अफवा पसरवत आहेत की कोरोना लस नपुंसकत्व आणेल, पण असे काहीही घडत नाही. मी देखील लस घेतल्यानंतर टेन्शनमध्ये होतो आणि त्यानंतर 3-4 महिन्यांनी स्वत: ची तपासणी केली असता काहीच झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे. 

माजी मंत्री संजय पाठक यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्ही टेन्शन होऊ नका आणि कोणत्याही गोष्टी मनावर घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत, लसीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येकजण सुरक्षित असेल असं देखील म्हटलं आहे. पाठक यांच्या या विधानाचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 154 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 25,166 नवे रुग्ण, 5 महिन्यांतील नीचांक

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (17 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,69,846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 97.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतBJPभाजपा