शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"हिंमत असेल तर..."; वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मुलीने दिलं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 5:59 PM

Kashmiri pandit makhanlal bindroo daughter shraddha bindroo : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली.

नवी दिल्ली - श्रीनगरचे प्रमुख फार्मासिस्ट माखनलाल बिंद्रू यांची मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्यांची मुलगी श्रद्धा बिंद्रूने वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्यांना थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. बिंद्रू यांची श्रीनगरमधील त्यांच्या बिंद्रू मेडीकेट या दुकानात हत्या करण्यात आली. श्रद्धा बिंद्रू यांनी "तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलाल यांच्या आत्म्याला मारू शकत नाही" असं देखील म्हटलं आहे. 

श्रद्धा बिंद्रू यांनी "माझे वडील जरी मरण पावले असतील, पण त्यांचा आत्मा सदैव जिवंत राहील. तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलाल यांच्या आत्म्याला मारू शकत नाही. ज्याने माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या, त्याने माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिले, तर राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका आणि दगड दिले. तुम्हाला बंदुका आणि दगडांनी लढायचे आहे? हा भ्याडपणा आहे. सर्व राजकारणी तुमचा वापर करत आहेत, या आणि शिक्षणाने लढा द्या" असं म्हटलं आहे. 

"तुम्ही फक्त दगड फेकू शकता आणि मागून गोळ्या घालू शकता"

"ज्यांनी काम करताना माझ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्याशी समोरासमोर येऊन वाद घाला. मग तुम्ही कोण आहात हे आम्ही पाहू. पण तुम्ही हे करणार नाही. कारण तुम्ही एक शब्द बोलण्यासाठीही सक्षम नाही. तुम्ही फक्त दगड फेकू शकता आणि मागून गोळ्या घालू शकता" असं देखील श्रद्धा यांनी म्हटलं आहे. तसेच "मी एक सहाय्यक प्राध्यापक आहे. मी शून्यापासून सुरुवात केली. माझ्या वडिलांनी सायकलवरून कामाला सुरुवात केली."

"माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाहीत"

"माझा भाऊ एक प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आहे, माझी आई मेडिकलमध्ये बसते. आम्ही आज जे आहोत ते आम्हाला माखनलाल बिंद्रू यांनी बनवले. माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाहीत. हिंदू असूनही मी कुराण वाचले आहे. कुराण म्हणते की तुम्ही शरीराला मारू शकता, आत्मा जिवंत राहू शकतो. माखनलाल बिंद्रू आत्म्याने कायम जिवंत राहतील" असं देखील श्रद्धा बिंद्रू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी