शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 12:09 IST

स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य...

श्रीनगर - स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केले आहे. सद्यस्थितीत काश्मीरशी जोडल्या गेलेल्या देशांमुळे काश्मीरला स्वातंत्र मिळणे शक्य नाही. मात्र काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नाही, असेही सोझ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोझ यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. 

सोझ म्हणाले, स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मिरी जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे मला वैयक्तिकरीत्या वाटते. काश्मीरला ना भारतासोबत राहायचे आहे ना पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करून घ्यायचे आहे. सद्यस्थितीत काश्मीरमधील जनतेसाठी शांततापूर्ण वातावरण तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून येथील जनता शांततेने नांदू शकेल." दरम्यान, आपल्या या वक्तव्याशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसून, वैयक्तीक पातळीवर आपण काश्मिरी जनतेच्यावतीने हे वक्तव्य करत असल्याचेही सोझ यांनी पुढे स्पष्ट केले. 

सैफुद्दीन सोझ हे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी काश्मीरचा इतिहास आणि वर्तमानाशी संबंधित एक पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. या पुस्तकात सोझ यांनी 'सार्वमत घेतल्यास काश्मिरी जनता भारत किंवा पाकिस्तानमध्ये न जाता स्वतंत्र राहणे पसंद करेल,' या पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानIndiaभारतManmohan Singhमनमोहन सिंग