शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Kashmir Files: 1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:47 IST

Hindu Targeted in Kashmir Valley: दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरु केल्याने काश्मीर सोडण्याच्या धमकीमुळे पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.

कुलगाममध्ये ड्रायव्हरच्या हत्येनंतर काश्मीरी हिंदूंना पुन्हा एकदा १९९० च्या काश्मीर हत्याकांडाची भीती वाटू लागला आहे. गेल्या ११ दिवसांत सहाव्यांदा हिंदूंवर हल्ला झाल्याने काश्मीरी पंडितांच्या हत्येवेळी न डगमगलेले राजपूत बिथरले आहेत. दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरु केल्याने काश्मीर सोडण्याच्या धमकीमुळे पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.

सतीश कुमार सिंह या ५५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला आहे. यावर आता राजपूतांकडून प्रतिक्रिया आली आहे. त्यांना जर आमच्यापासून त्रास होत असेल तर आम्ही इथून जाण्यास तयार आहोत, असे कुलगामच्या काकरान गावाचे प्रमुख जगदीश सिंह यांनी म्हटले आहे. सतीश यांच्या मृतदेहानंतर काश्मीर सोडण्याची चिठ्ठी सापडली. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यातील काही भागात राजपूत कुटुंबे राहतात. त्यांनी कितीही बिकट परिस्थिती आली तरी काश्मीर सोडले नाही. 

ही कुटुंबे सफरचंदाचा व्यापार करतात. अचानक त्यांच्या जिल्ह्याकडे दहशतवाद्यांनी मोर्चा वळविल्याने ते भयभीत झाले आहेत. काही बाहेरच्या शक्तींनी आमच्या गावातील वातावरण बिघडविले आहे. आम्हाला घाटी सोडायची आहे, असे जगदीश सिंह म्हणाले. 

गावातील काश्मीरी मुस्लिम मला येऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगत आहेत. घाबरू नका, तुम्ही आमचे भाऊ आहात, असे सांगत आहेत. मात्र, १९९० मध्ये जी भीती काश्मीरी पंडितांना वाटत होती, तीच आता या राजपूतांना वाटू लागली आहे. दहशतवाद्यांनी ११ व्या दिवशी सहाव्या हिंदूला मारले आहे. ते मुद्दाम लक्ष्य करून हे करत आहेत. सतीश हे त्यांच्या घरात बसलेले होते, इफ्तार सुरु होता, तेवढ्यात दोन लोक आले आणि त्यांना बाहेर बोलावले. काही महत्वाचे बोलायचे आहे असे ते म्हणाले. यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. रमजानच्या महिन्यातच दहशतवाद्यांनी हे कृत्य केले.

यानंतर काश्मीरी कॉलोनीमध्ये एक चिठ्ठी सापडली. 'लश्कर ए इस्लाम' नावाच्या दहशतवादी संघटनेने ही चिठ्ठी एका घरावर चिकटविली आहे. यामध्ये एकतर घाटी सोडा किंवा मरण्यास तयार रहा अशी धमकी देण्यात आली आहे. एका न्यूज चॅनेलला जगदीश यांनी ही माहिती दिली आहे. एनबीटीने याचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद