शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर मध्यस्थीच्या ट्रम्प यांच्या दाव्यावरून वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 01:53 IST

ट्रम्प यांच्या वक्तव्याचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत पडसाद उमटले. विरोधकांनी घोषणा देत सरकारला धारेवर धरल्याने गरमागरमी झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी निवेदन करून पंतप्रधानांनी ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंती केली नाही

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा जुना वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी मला केली होती. अशी मध्यस्थी करायला मला आवडेल, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावरून मंगळवारी संसदेत व संसदेबाहेरही राजकीय वादळ उठले. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांनी अशी कोणतीही विनंती कधीही केली नव्हती, असा खुलासा सरकारने केला. परंतु मोदी यांनी स्वत: याचा नि:संदिग्ध इन्कार करून ट्रम्प यांना खोटे पाडावे, असा आग्रह विरोधकांनी लावून धरला.

ट्रम्प यांच्या वक्तव्याचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत पडसाद उमटले. विरोधकांनी घोषणा देत सरकारला धारेवर धरल्याने गरमागरमी झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी निवेदन करून पंतप्रधानांनी ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंती केली नाही व भारताची काश्मीरविषयी पूर्वीपासूनची भूमिका कायम आहे, असे सांगितले. सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे, पण स्वत: मोदी यांनी निवेदन करावे, अशी विरोधकांची मागणी होती. यावरून लोकसभा एकदा तहकूब करावी लागली व विरोधकांनी नाराजी दाखवत सभात्यागही केला.

ट्रम्प यांनी असे वक्तव्य केल्याची बातमी येताच परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी रात्रीच त्याचे खंडन केले होते. तेच सूत्र पकडून निवेदन करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी ट्र्म्प यांना मध्यस्थीची अशी कोणताही विनंती केलेली नाही, याची मी नि:संदिग्धपणे ग्वाही देतो. काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे व तो कोणाही त्रयस्थाच्या मध्यस्थीविना दोन्ही देशांची एकत्र बसूनच सोडवायला हवा, ही भारताची भूमिका आजही कायम आहे. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानने सीमेपलीकडून होणारा दहशतवाद पूर्णपणे थांबविल्याखेरीज त्यांच्याशी चर्चा होणार नाही, यावरही भारत ठाम आहे. उभय देशांमधील वाद सिमला करार व लाहोर जाहीरनाम्याच्या चौकटीत राहूनच सोडविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे आनंद शर्मा व कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनी राज्यसभेत हा विषय उपस्थित केला. भारताची काश्मीरविषयी भूमिका बदलली आहे का, असा राजा यांचा सवाल होता तर खुद्द पंतप्रधानांनी याचा खुलासा करावा, अशी शर्मा यांची मागणी होती. लोकसभेत काँग्रेसचे के. सुरेश यांनी यावरून स्थगन प्रसातावाची रीतसर नोटीस दिली होती. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. भारताने अमेरिकेपुढे शरणागती पत्करली असल्याचा दावा काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी केला. संसदीयकार्य राज्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी यास आक्षेप घेतला.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी