शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 04:33 IST

आपल्या सर्वांनाच इतरांना लेबले चिकटवण्याची जणू सवयच झालेली असते.

- संजीव साबडेआपल्या सर्वांनाच इतरांना लेबले चिकटवण्याची जणू सवयच झालेली असते. एखाद्या व्यक्तीचे चांगले काम न पाहता, केवळ त्याच्यातील कमतरता पाहून त्याच्यावर शिक्के मारले जातात. अलीकडील काळात करुणानिधींच्या बाबतीतही असेच घडले. कलानिधी व दयानिधी मारन, मुलगी कणिमोळी, माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या भ्रष्टाचाराचे सारे वार स्वत:वर घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ते काहीसे बदनाम झाले. मुलगा स्टॅलिन यांची मग्रुरी व अळगिरी यांनी ठिकठिकाणी गोळा केलेल्या जमिनी हे सारे त्यांना दिसत नव्हते, असे नव्हे. पण हे सारे घडत असताना, त्यांनी वयाची ८५ गाठली होती आणि आपण यावर नियंत्रण आणू शकत नाही, हे ते कळून चुकले होते. हे प्रकार पाहण्याखेरीज त्यांच्याकडे पर्यायच नव्हता.मात्र त्यामुळे भ्रष्ट नेत्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा नेता अशी त्यांची अलीकडील प्रतिमा बनत गेली. रामस्वामी नायकार व अण्णादुराई यांचा वारसदार अशी त्यांची ओळख संपत गेली. तामिळ वाघांना मदत करणारा नेता असा शिक्का तर आधी बसला होताच. त्यात त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी नसला तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे इमलेच बांधले. पण सोबतच्या कार्यकर्त्याला, नेत्याला दूर जाऊ द्यायचे नाही, अशा धोरणातून त्यांनी त्याकडे डोळेझाकही केली. मुलगी कणिमोळी, स्टॅलिन व अळगिरी यांनाच ते नियंत्रणात ठेवू शकले नाहीत, तर इतरांचे काय?पण असे असूनही गेली दोन वर्षे अतिशय आजारी असलेल्या करुणानिधी यांची लोकप्रियता अजिबात कमी झाली नव्हती. केवळ त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर रोज गर्दी होत असे. तब्येत बरी असली की त्यांना व्हीलचेअरवरून बाहेर आणले जाई. आपल्या समर्थकांना हात करून ते पुन्हा आत जात. ते तब्बल १३ वेळा विधानसभेवर निवडून आले. तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून त्यांनी या निवडणुका लढविल्या आणि एकदाही ते पराभूत झाले नाहीत. हा एक विक्रमच म्हणता येईल. ते १९६९ ते २0११ या काळात पाच वेळा मुख्यमंत्री झाले. तामिळनाडूमध्ये विरोधी सरकार फक्त तामिळनाडूचे होते.आपण द्रविडी चळवळीचे, तामिळ जनतेचे प्रतिनिधी आहोत, हे तामिळनाडूबाहेरही त्यांनी पटवून दिले. कायम पांढरा सदरा व लुंगी, डोळ्यावर काळा चश्मा आणि अंगावर उपरणे असा त्यांचा वेष असे. कदाचित ते त्यांचे स्टाइल स्टेटमेंटही म्हणता येईल. त्यामुळे आजही बहुसंख्य तामिळ नेते अशीच वेषभूषा करतात. ते पूर्णपणे हिंदीविरोधी होते आणि कमी शिकल्यामुळे इंग्रजी त्यांना येत नव्हती. पण राष्ट्रीय राजकारणात स्वत:चा ठसा उमटवण्यात त्यामुळे त्यांना अजिबात अडचण आली नाही. ते कधी दिल्लीच्या सत्तेत गेले नाहीत. पण अनेकदा दिल्लीच्या सत्ताधाºयांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागले.राज्यातील काँग्रेस संपविण्यात करुणानिधी यांचा मोठा वाटा होता. हे त्यांनी केले, जेव्हा एमजीआर पूर्णपणे राजकारणात सक्रिय नव्हते. जयललिता तर नव्हत्याच आणि शिवाजी गणेशनसारखा लोकप्रिय अभिनेता काँग्रेसमध्ये असतानाही त्याचा प्रभाव करुणानिधी यांनी तामिळ राजकारणावर पडणार नाही, याची दक्षता घेतली. त्यांनी सुमारे ४0 चित्रपटांसाठी कथा वा पटकथा लिहिल्या. त्यांची पटकथा असलेला अखेरचा चित्रपट २0११ साली प्रदर्शित झाला. याखेरीज असंख्य कथा, कादंबºया, कविता, अनेक चरित्रे, नाटके, ऐतिहासिक कथा त्यांच्या नावावर आहेत. द्रमुकचे मुरासोली हे मुखपत्रही त्यांनीच सुरू केले.वयाच्या शाळेत असतानाच विद्यार्थी नेते बनले. जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या करुणानिधी यांनी आधी हिंदीविरोधाला सुरुवात केली. त्यानंतर ते द्रमुकचे नेते झाले. तामिळनाडूतील कल्लागुडी या औद्योगिक गावात दालमिया यांचा उद्योग उभा राहणार असल्याने त्या रेल्वे स्थानकालाच दालमियापूरम असे नाव देण्यात आले. त्याविरोधात त्यांनी १४ व्या वर्षी यशस्वी आंदोलन केले. तामिळ अस्मिता कायम ठेवण्याचा हा प्रकार होता. तेव्हापासून लोकप्रिय झालेल्या या प्रभावी वक्ता असलेल्या या नेत्यामागे अखेरपर्यंत लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीChennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडू