शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:20 IST

BASAVARAJ BOMMAI : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे.

बंगळुरू : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रकर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद सुरु आहे. यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक सीमा भागातील प्रश्नावरही बेधडक मत व्यक्त करत कर्नाटक सरकारला ठणकावले. यावेळी सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र हे साध्य करील. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, असे अजित पवार यांनी म्हटले. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका स्पष्ट आहे आणि राज्य कोणत्याही प्रकारे झुकणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, त्यांनाही (महाराष्ट्राला) हे माहित आहे. मी महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती करतो की, त्यांनी आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी भाषा किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. याचबरोबर, कर्नाटक राज्य आपली एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाषेचा मुद्दा नौटंकी किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहन केले. यासोबतच अनेक कन्नड भाषिक महाराष्ट्रात आहेत, त्यांचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याआधी विधानसभेतही बसवराज बोम्मई म्हणाले होते की, कर्नाटकची एक इंचही सीमा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. जर महाराष्ट्रातील काही भाग कर्नाटक राज्यात सामील करायचा असेल आणि त्यासंदर्भात ठराव मंजूर झाला असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे. याशिवाय,सीमाप्रश्नावर महाजन अहवाल अंतिम असल्याची सरकारची स्पष्ट भूमिका आहे, तरीही काही व्यक्ती आणि संघटना वारंवार शांतता बिघडवत आहेत आणि हे निषेधार्ह आहे. हे सभागृह एकमताने अशा कृत्यांचा निषेध करते आणि त्यात गुंतलेल्या गैरकृत्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेते. कर्नाटक सरकारला दोन्ही राज्यांमध्ये (महाराष्ट्रासह) सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार