शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:20 IST

BASAVARAJ BOMMAI : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे.

बंगळुरू : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रकर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद सुरु आहे. यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक सीमा भागातील प्रश्नावरही बेधडक मत व्यक्त करत कर्नाटक सरकारला ठणकावले. यावेळी सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र हे साध्य करील. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, असे अजित पवार यांनी म्हटले. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका स्पष्ट आहे आणि राज्य कोणत्याही प्रकारे झुकणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, त्यांनाही (महाराष्ट्राला) हे माहित आहे. मी महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती करतो की, त्यांनी आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी भाषा किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. याचबरोबर, कर्नाटक राज्य आपली एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाषेचा मुद्दा नौटंकी किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहन केले. यासोबतच अनेक कन्नड भाषिक महाराष्ट्रात आहेत, त्यांचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याआधी विधानसभेतही बसवराज बोम्मई म्हणाले होते की, कर्नाटकची एक इंचही सीमा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. जर महाराष्ट्रातील काही भाग कर्नाटक राज्यात सामील करायचा असेल आणि त्यासंदर्भात ठराव मंजूर झाला असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे. याशिवाय,सीमाप्रश्नावर महाजन अहवाल अंतिम असल्याची सरकारची स्पष्ट भूमिका आहे, तरीही काही व्यक्ती आणि संघटना वारंवार शांतता बिघडवत आहेत आणि हे निषेधार्ह आहे. हे सभागृह एकमताने अशा कृत्यांचा निषेध करते आणि त्यात गुंतलेल्या गैरकृत्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेते. कर्नाटक सरकारला दोन्ही राज्यांमध्ये (महाराष्ट्रासह) सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार