शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कर्नाटक सरकार कोसळलं, इंटरनेट मीम्सनी उसळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:51 IST

सरकार कोसळताच सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार अखेर कोसळलं. त्यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला. पंधरा आमदारांचे राजीनामे, त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे राजीनामे, सर्वोच्च न्यायालयात झालेले युक्तिवाद अशा एकापाठोपाठ एक घडामोडी घडल्यानंतर अखेर आज कर्नाटकातील राजकीय नाटक संपलं. कर्नाटकच्या विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं ९९ आमदारांनी मतदान केलं. तर १०५ मतं सरकारविरोधात गेली. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. 

चौदा महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला ८० आणि जेडीएसला ३७ जागांवर समाधान मानावं लागलं. २२४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, जेडीएसनं आघाडी केली. त्यासाठी काँग्रेसनं कमी जागा असूनही जेडीएसच्या एच. डी. कुमारस्वामींनी मुख्यमंत्री केलं. मात्र हे सरकार स्थापनेपासूनच अस्थिर होतं.भाजपाकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस, जेडीएसनं अनेकदा केला. आघाडी सरकार चालवताना कुमारस्वामी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खटकेदेखील उडाले. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी राजीनामा दिला. या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई गाठली. या सगळ्या घडामोडींच्या मागे भाजपाच असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करता आलं नाही.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस