शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 17:04 IST

कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते.

बंगळुरु- केरळपाठोपाठ कर्नाटकमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. राज्याच्या कोडुगू जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु असून अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यातील काळी मिरी, वेलदोडा आणि कॉफीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते. पावसामुळे कोडुगूच्या डोंगराळ प्रदेशात अनेक लोक अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराच्या टीम्स कार्यरत आहेत. हवामान खात्याने उडुपी, उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या पावसामुळे 12 लोकांचे प्राण गेल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे.कोडुगू जिल्ह्यातील लोकांना मदत करण्यासाठी कुमारस्वामी यांनी केंद्राकडे 100 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. पंतप्रधानांनी केरळला 500 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यांनी कोडुगूसाठी किमान 100 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली. कोडुगूमध्ये रस्त्यांचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोडुगूमधील 845 घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून 773 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 6620 लोकांना 50 आश्रयछावण्यांमध्ये हलविण्यात आले असून पावसाचा तडाखा बसलेल्या कुटुंबाना प्राथमिक मदत म्हणून 3800 रुपये आणि धान्य देण्यात आले आहे.

कर्नाटकच्या मंत्र्यांनी फेकले बिस्किटांचे पुडेकर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे बंधू आणि मंत्री एच. डी. रेवण्णा नव्या वादात सापडले आहेत. पूरग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या नावाखाली त्यांच्या अंगावर बिस्किटांचे पुडे फेकण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील आश्रयछावणीमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रेवण्णा यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रेवण्णा 'असंवेदनशील' असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

एच.डी. रेवण्णा हसन जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळेस बिस्किटांचे पुडे लोकांच्या हातामध्ये देणे शक्य असूनही ते त्यांच्या दिशेने फेकत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर रेवण्णा यांनी किमान संवेदनांचे भान राखत वागायला हवे होते अशा भावना व्यक्त होत आहेत. रेवण्णा यांच्याबरोबर अर्कालगुडुचे मदार एटी रामस्वामीसुद्धा उपस्थित होते. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणRainपाऊसfloodपूर