शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

येडियुरप्पांनी सिद्ध केले बहुमत, कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदानाने झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:49 IST

भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले.

बंगळुरू - भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. कर्नाटक विधानसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य काही काळासाठी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. दरम्यान, आज विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास येडियुरप्पांनी व्यक्त केला होता. 

 आज विधानसभेमध्ये विश्वासमत प्रस्ताव सादर करताना येडियुरप्पा म्हणाले की, राज्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. आम्ही ते व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही, याचा विश्वास आम्ही तुम्हाला देतो.''शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येडियुरप्पा म्हणाले की, राज्यात दुष्काळ पडला आहे. मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू इच्छितो. पंतप्रधान शेतकरी योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आता आमच्यासोबत राहून काम करा, असे आवाहन मी विरोधी पक्षांना करतो. तसेच एकमताने माझ्यावर विश्वास दर्शवा, असे आवाहन मी सभागृहाला करतो. 

दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी विश्वासमत प्रस्तावाला विरोध करताना मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले येडियुरप्पा सरकार कसे टिकवणार असा सवाल केला. ''येडियुरप्पाजी तुम्हा बंडखोरांसोबत आहात. तुम्ही स्थिर सरकार कसे काय देणार? हे अशक्य आहे. मी या विश्वासमत प्रस्तावाला विरोध करतो. कारण हे सरकार असंवैधानिक आणि अनैतिक आहे.'' असे सिद्धारामय्या म्हणाले. 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकBJPभाजपा